spot_img
अहमदनगरअहमदनगरमध्ये अपहरणाचा थरार..? विद्यार्थ्यांना पळवण्याचा प्रयत्न थोडक्यात फसला; नेमकं काय घडलं..

अहमदनगरमध्ये अपहरणाचा थरार..? विद्यार्थ्यांना पळवण्याचा प्रयत्न थोडक्यात फसला; नेमकं काय घडलं..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील पडोळे वस्तीवरील मराठी शाळेच्या जवळ चार शालेय विद्यार्थ्यांना चाकूचा धाक दाखवून आणि चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

घटनेवेळी अज्ञात व्यक्तीने एक ओमिनी गाडी उभी करून विद्यार्थ्यांना गाडीत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, एक जागरूक ग्रामस्थाने तत्काळ कारवाई करत या अज्ञात व्यक्तींना विचारपूस केली आणि परिसरातील लोकांना घटनास्थळी बोलावले. लोक जमा होताच, अज्ञात व्यक्तींनी विद्यार्थ्यांना सोडून गाडीला धुम ठोकली.

या प्रकारामुळे घाटशिरससह परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी, सहावी-सातवीत शिकणारे तीन ते चार विद्यार्थी सायकल खेळत असताना, त्यांना गाडीतील अज्ञात व्यक्तींनी चॉकलेटचे आमीष दाखवून पळवण्याचा प्रयत्न केला होता.

या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचा वातावरण पसरला आहे. सरपंच गणेश पालवे यांनी पालक आणि शिक्षकांना अधिक सजग राहण्याचे आवाहन केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संग्राम जगताप यांची प्रखर हिंदुत्वाची भूमिका का?, वाचा इनसाईड स्टोरी..

इनसाईड स्टोरी : स्व. अरुणकाकांसह संग्राम जगताप यांच्या राजकीय वाटचालीत मुस्लिम मतपेढी कधी निर्णायक...

मोठी बातमी! शरद पवारांची राज-उद्धव ठाकरेंना साथ, रोखठोक बोलले..

मुंबई । नगर सहयाद्री राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीतूनच त्रिभाषा सूत्र राबवण्याच्या निर्णयावरुन राज्यातील राजकारण चांगलेच...

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ‘या’ मुद्द्यावरून तापणार, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री राज्य विधिमंडळाचे यंदाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या...

राज्यात पावसाची रिपरिप वाढणार का?; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात येत्या पाच दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान...