spot_img
महाराष्ट्रपुलाखाली तीन मृतदेह आढळले! धक्कादायक घटनेने शहर हादरले..   

पुलाखाली तीन मृतदेह आढळले! धक्कादायक घटनेने शहर हादरले..   

spot_img
Maharashtra News: पुलाखाली तीन मृतदेह आढळले आहेत. पोलिसांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढून तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आयुब महमद नदाफ, रेश्मा हुसेन होटगी, जया लक्ष्मण कांबळे अशी मयत व्यक्तींची नावे आहे. 
पुलाखाली तीन मृतदेह आढळले आहेत. यातील दोन मृतदेह हे महिलांचे, तर एक मृतदेह पुरुषाचा आहे. हे तीनही मृतदेह दोन दिवसांपूर्वी पाण्यात पडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोमवार दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी सदरची घटना उघडकीस आली.
आयुब महमद नदाफ, रेश्मा हुसेन होटगी, जया लक्ष्मण कांबळे सर्व राहणार आनंद नगर मुरूम, तालुका उमरगा हे तिघेजण मोटारसायकल क्रमांक एम एच 13 सी इ 0810 ने सोलापूरहून मुरूम कडे जात होते. दरम्यान पुलाला संरक्षक कठडा नसल्याकारणाने रात्रीच्या वेळी दिसले नसल्याने पुलावरून मोटारसायकल पाण्यात पडली असल्याचा अंदाज नागरिकांतून व्यक्त होत आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. सदरची घटना धाराशिवमधील बाभळगावजवळील सोलापूर-हैदराबाद महामार्ग क्रमांक ६५ वर घडली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...