spot_img
ब्रेकिंगसणासुदीच्या काळात एकाच खोलीत तिघांचे मृतदेह आढळले!, कुठे घडला प्रकार?

सणासुदीच्या काळात एकाच खोलीत तिघांचे मृतदेह आढळले!, कुठे घडला प्रकार?

spot_img

Crime News: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून खळबळ उडाली आहे. दिल्लीतील एका घरात तीन जणांचे मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. आई आणि मुलींच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. तिघांच्या मृत्यूची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी तिघांच्या आत्महत्येवर संशय व्यक्त केला आहे.

दिल्लीतील बदलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलीस स्टेशनमध्ये कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्यांच्या घरातून दुर्गंध येत असल्याची माहिती दिली. त्या घरात तीन जण लोक राहतात. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना सांगितला. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पूजा आणि दोन मुलींचे मृतदेह ताब्यात घेतले. आई पूजा या मोलरबंद येथील गल्ली क्रमांक १६ येथील ४३ क्रमांकाच्या दुसऱ्या मजल्यावर कुटुंब राहत होते. दोन्ही मुलीपैकी एक जण १७-१८ वयाची आहे. तर एक जण ८-९ वयाची आहे.

तिघांचे मृतदेह एकाच खोलीत आढळले. तिघांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळले. पोलीस तपासाच समोर आलं की, ४-५ दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यांनी आर्थिक विवंचतेून आत्महत्या केल्याचंही बोललं जात आहे. त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून घराचं भाडे दिले नव्हते. तिघांच्या मृत्यूची माहिती मिळताच गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील कारवाई सुरु केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....