spot_img
देशविराट कोहलीला धोका; RCB चे सराव सत्र अचानक रद्द! नेमकं काय घडलं?

विराट कोहलीला धोका; RCB चे सराव सत्र अचानक रद्द! नेमकं काय घडलं?

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा खेळाडू विराट कोहलीच्या सुरक्षेबाबत एक मोठी माहिती समोर आली असून कोहलीच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगितले जात आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेतील एलिमिनेटरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ चेन्नईला क्वालिफायर २ चा सामना खेळण्यासाठी रवाना होईल. तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

दैनिक आनंद बाजार पत्रिकाने गुजरात पोलीस अधिकाऱ्यांचा हवाला देऊन नमुद केले आहे की, विराट कोहलीच्या सुरक्षेला धोका असल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने प्रशिक्षण सत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही संघांनी पत्रकार परिषदही घेतली नव्हती. गुजरात पोलीसांनी सोमवारी (२० मे) रात्री अहमदाबादच्या विमानतळावर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय घेऊन ४ अज्ञातांना अटक केली आहे. पोलीसांनी या अज्ञातांचा ठावठिकाणा शोधून काढला असता, त्या ठिकाणी संशयास्पद व्हिडिओ आणि शस्त्र जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर १ आणि एलिमिनेटरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर स्टेडियमवर होणार आहे. क्वालिफायर १ च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणिक सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा सराव गुजरात कॉलेजच्या ग्राऊंडवर सुरु होता. अचानक प्रशिक्षण रद्द करण्याचा निर्णय का घेतला, याबाबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून कुठंलही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...