spot_img
अहमदनगरहजारो उमेदवार वंचित!, दुसरा टप्पा कधी?; आमदार सत्यजीत तांबे यांची मोठी मागणी

हजारो उमेदवार वंचित!, दुसरा टप्पा कधी?; आमदार सत्यजीत तांबे यांची मोठी मागणी

spot_img

संगमनेर | नगर सह्याद्री
राज्यातील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गतिशील करण्यात आली असून, त्याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. मात्र, आता शासनाने तातडीने दुसरा टप्पा सुरू करून शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली. शिक्षक भरतीसाठी पोर्टलच्या अंमलबजावणीमध्ये होत असलेल्या दिरंगाईमुळे हजारो उमेदवारांना नोकरीच्या संधीपासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पहिल्या टप्प्यात काही त्रुटी आढळल्या होत्या. त्या दुरुस्त करूनच दुसरा टप्पा सुरू करावा, जेणेकरून शिक्षक भरती प्रक्रिया अधिक सुरळीत आणि न्याय्य होईल. पूव सरकारने शिक्षणसेवक हे पद निर्माण केले होते, मात्र आता त्याची आवश्यकता नसल्याचे नमूद करत, हे पद रद्द करून उमेदवारांची थेट शिक्षक म्हणून नियुक्ती करावी, अशीही आ. तांबे यांनी मागणी केली. त्यांनी सांगितले की, शिक्षणसेवक पदामुळे अनेक उमेदवारांना अन्याय सहन करावा लागत आहे, त्यामुळे यावर त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे.

राज्यात हजारो उमेदवार शिक्षक पदासाठी प्रतीक्षेत असून, रिक्त जागा असूनही भरती प्रक्रिया विलंबात आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी त्वरित करावी, असेही आ. तांबे यांनी स्पष्ट केले.

उमेदवारांना थेट शिक्षक म्हणून नियुक्ती द्या
शिक्षणसेवक हे पद राज्य सरकारने शिक्षक भरती प्रक्रियेत अंतरिम स्वरूपात तयार केले होते. या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियमित शिक्षकांप्रमाणे सेवा दिली जात असली, तरी त्यांना कमी वेतन आणि मर्यादित सेवा सुविधांचा लाभ मिळतो. त्यामुळे शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतरही शिक्षणसेवकांना स्थैर्य आणि संपूर्ण लाभ मिळत नाहीत. त्यामुळे हे पद रद्द करून उमेदवारांची थेट शिक्षक म्हणून नियुक्तीची मागणी होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...