spot_img
अहमदनगर‌‘त्या‌’ लाडक्या बहिणींंना पैसे परत करावे लागणार! कारण आलं समोर..

‌‘त्या‌’ लाडक्या बहिणींंना पैसे परत करावे लागणार! कारण आलं समोर..

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज नवीन बातम्या समोर येत आहेत. सरकार सत्तेत आल्यापासून या योजनेचा लाभ निकषांच्या आधारे देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आता या योजनेविषयी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ज्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला त्यांचे पैसे परत घेणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे.

खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांकडून सरकार पैसे सरकार परत घेणार का असा आदिती तटकरे यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी ही महत्वाची माहिती दिली. याविषयी बोलताना तटकरे यांनी, असं कोणी म्हटलं की पैसे परत घेणार नाही. सरकारी चलनच्या माध्यमातून ते पैसे राज्य शासनाच्या तिजोरीत येतील. राज्य शासनाची तिजोरी असते.

त्यासाठी अर्थ नियोजन विभागाशी आमचा संपर्क चालू आहे. या विभागाच्या माध्यमातून रिफंड हेड (परतावा अधिकारी) तयार करून देतील. त्या माध्यमातून हे पैसे राज्याच्या तिजोरीत येतील. हे पैसे लोकोपयोगी, लोककल्याणकारी कामांसाठी, योजनांसाठी वापरले जातील.

योजनांमध्ये जशी रुटीन रिफंड सिस्टीम (नियमित परतावा प्रणाली) असते तशीच प्रणाली इथे देखील सुरू होईल. ज्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे पैसे देखील राज्य सरकारच्या तिजोरीत परत येतील. अशी माहिती त्यांनी दिली.

साडेचार हजार महिलांनी स्वतःहून पुढे येत त्यांचे अर्ज मागे घेतले असले तरी अजूनही अनेक महिला आहेत ज्या चुकीची माहिती प्रदान करत या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिला अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे समोर येईल असे त्यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये बंद घर फोडले; अडीच लाखांचे दागिने लांबविले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - श्रीकृष्णनगर, केडगाव येथील प्लॉट क्रमांक ३० येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी...

धक्कादायक; बँक कर्मचार्‍याने १२ तोळे सोने लांबविले, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : नगरमध्ये बँक कर्मचार्‍यांने १२ तोळे सोने लंपास केल्याची प्रकार उघडकीस...

दोन लेकरांसह आईची विहिरीत उडी; तिघांचाही मृत्यू, नगरमधील घटना

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील धक्कादायक घटना जामखेड | नगर सह्याद्री रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जामखेड तालुयातील नायगाव...

बोगस मतदारांच्या आरोपावरून विखे-थोरात भिडले, काय म्हणाले पहा

शिर्डी | नगर सह्याद्री बोगस मतदानाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले...