spot_img
अहमदनगरयंदा वैरण भाव खाणार! निसर्गाचा लहरीपणा; पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

यंदा वैरण भाव खाणार! निसर्गाचा लहरीपणा; पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

spot_img

सुपा / नगर सह्याद्री:-
पारनेर तालुक्यातील सुपा जिरायती पट्ट्यात चालू वष पावसाने चांगली कृपादृष्टी दाखवूनही शेतकऱ्यांची झोळी मात्र रिकामीच राहणार आहे. गत वष खरिप हंगाम पूर्ण हा वाया गेला. उशिरा का होईना परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. आणि शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. नदी नाले ओसंडून वाहू लागले. बळीराज्याची रब्बी हंगामासाठी लगबग सुरू झाली. शेतात असलेल्या मुग हे पीक उपळली असल्याने तोडता आले नाही. तर काही शेतकऱ्यांनी पिकांवर पाळ्या घातल्या व रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, सोयाबीन, कापूस, तुर, मका, वटाणा, गहू आदींची पेरणी करण्यात आली. तर पाणी मुबलक असल्याने जणावरांसाठी घासाचे बी मोठ्या प्रमाणात टाकण्यात आले आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात उपळी तयार झाली. उपळी संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली. उपळी नंतर सावरत असतांनाच बळीराजा वातावरणाशी मोठा संघर्ष करताना दिसत आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना पोषक असे वातावरण नसल्याने या पिकावर रोगराईचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्याने महागडे औषधे विकत घेऊन फवारण्या कराव्या लागत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. रोजच्या ढगाळ वातावरणामुळे ज्वारी, हरभरा, गहू ह्या पिकांना माव्यासह तुडतुडे, चिकटा, करप्या या रोगाने ग्रासले आहे. तर मका,तुर यावर लष्करी आळईचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.

कांदा उत्पादनात घट होणार!
तालुक्यातील सुपा, वाळवणे, आपधूप, वाघुंडे, हंगा, मुंगशी, म्हसणे, घाणेगाव, बाबुड, रूईछत्रपती, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीद, भोयरे गांगर्डा, कडूस, पळवे, जातेगाव आदी भागात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी कांद्याला बाजारभाव मिळत असल्याने 20 ते 25 हजार रुपये पायलीने रोपे विकत घेऊन लागवड केली मात्र ढगाळ वातावरणामुळे हे पिक रोगराईने ग्रासले असून एकरी उत्पादनात मोठी घट होणार आहे.
– दिपक खंदारे, प्रगतशील शेतकरी

वैरण भाव खाणार!
सध्या दुधाला बाजारभाव मिळत नसल्याने गायांच्या किमतीमध्ये कमालीची घट झाली आहे. 30 हजार ते 60 हजारांपर्यंत गाईच्या किंमती आहेत. दुग्धव्यवसाय परीसरात मोठ्या प्रमाणात असल्याने चालू वष त्या तुलनेत वैरण (कडबा) उपलब्ध होणार नसल्यामुळे 1 हजारांपासून ते 2 हजार 500 रूपये विकणारा कडबा यावष 3 हजार 500 ते 4 हजारांपर्यंत शेतकऱ्यांना विकत घ्यावा लागणार आहे.
– संजय पवार, प्रगतशील शेतकरी

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट ; नगरसेवक योगीराज गाडे काय म्हणाले पहा

अहिल्यानगर । नगर सह्याद्री महापालिका व आयुक्त यशवंत डांगे जनतेची दिशाभूल करत असून नव्या कचरा...

आयुक्त डांगेंच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, नेमकं प्रकरण काय पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर...

धक्कादायक ! डॉक्टर महिलेच्या मृत्यूचा PM रिपोर्ट आला पण…’या’ प्रश्नांचं गूढ अद्याप कायम

सातारा / नगर सह्याद्री - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या युवा...

बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम; पारनेरचे भूमिपुत्र आंदोलनात दाखल

पारनेर / नगर सह्याद्री - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी...