spot_img
अहमदनगरAhmednagar:.. हा विषय डिसेंबरला संपलाच पाहिजे! खासदार विखे यांनी अधिकाऱ्यांना भरली तंबी

Ahmednagar:.. हा विषय डिसेंबरला संपलाच पाहिजे! खासदार विखे यांनी अधिकाऱ्यांना भरली तंबी

spot_img

‘अमृत’चे ३० डिसेंबरला लोकार्पण

अहमदनगर | नगर सह्याद्री-

अमृत योजनेचे काम पूर्ण होऊन नगर शहरात वसंत टेकडीपर्यंत पाणी उपलब्ध झाले आहे. टाक्यांची उभारणी होऊन त्यातून पाणी पुरवठा करण्याचे काम १५ दिवसात पूर्ण करा. टाक्या भरण्यात अडथळा ठरणार्‍या अनधिकृत जोडण्या तोडून टाका, असे आदेश देत ३० डिसेंबरला अमृत पाणी योजना व फेज टू योजनेतील टायांचे लोकार्पण करण्यात येईल, अशी घोषणा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी केली.

खासदार विखे यांच्या उपस्थितीत महापालिकेत पाणी योजना, भूयारी गटार योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला.यावेळी अमृत योजनेतील सर्व स्थापत्य कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. तांत्रिक कामातील स्काडा योजनेचे काम पूर्ण होऊनही काही किरकोळ कामांमुळे ती कार्यान्वित झाली नाही. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद, प्रस्ताव यावरून मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकार्‍यांत टोलवाटोलवी सुरू झाली.

खासदार विखे यांनी कोणत्याही परिस्थितीत ही सर्व कामे पूर्ण करून ३० डिसेंबरला लोकार्पण करण्याचे जाहीर केले. तुम्ही काहीही करा, आता हा विषय ३० डिसेंबरला संपलाच पाहिजे, अशी तंबी त्यांनी दिली. भूयारी गटार योजनेचे बहुतांश काम झाले आहे. किरकोळ कामे सुरू आहेत. एसप्रेस फिडरच्या कामाचा कार्यारंभ आदेश देऊन हे काम मार्गी लावा, त्यासाठी वाढीव निधीची गरज असल्याने प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे सादर करा, मी तत्काळ निधी देतो, असे सांगत खासदार विखे यांनी यातून मार्ग काढला.

३१ जानेवारीपर्यंत ही कामे पूर्ण करा. नेहरू मार्केटच्या उभारणीबाबत यावेळी चर्चा झाली. महापालिकेने तयार केलेल्या तीन मजली इमारतीचे डिझाईन सादर केले. यात सुलभ शौचालयासाठी जागा प्रस्तावित करा, असे खासदार विखे यांनी सांगितले. तसेच, दोन मजली तरतूद करा. बांधकामासाठी जो खर्च येईल, त्यासाठी निधी उपलब्ध करून देतो, असे खासदार विखे यांनी यावेळी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...