spot_img
अहमदनगर'हे' राजकारण लोकशाहीला घातक! बाळासाहेब थोरात सरकारवर बरसले..

‘हे’ राजकारण लोकशाहीला घातक! बाळासाहेब थोरात सरकारवर बरसले..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जगातील देश विविध पद्धतीने विकास साधत आहेत. अशावेळी आपल्या देशात दंगली होणे, तणाव निर्माण होणे हे दुर्दैवी आहे. समाजात तणाव निर्माण होणार नाही, ही सरकारची जबाबदारी आहे. कोणत्याही राज्यकर्त्याच्या काळात समाज आनंदी असला पाहिजे. राज्यात दंगली होतायेत हे अभिमानाने सांगणार आहात का? अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितलेला राजधर्म पाळला पाहिजे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.

अहिल्यानगर येथे माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ उपस्थित होते. दिशा सालियान प्रकरणातून राजकारणाचा स्तर किती खाली सरला आहे, याचे मूर्तीमंत उदाहरण दिसून येते. राजकारणात मतभेद असतात पण तत्त्वाचे असावेत. एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करण्यापर्यंत राजकारण नेत असाल तर हे राजकारण लोकशाहीला घातक आहे. ठाकरे कुटुंबावर दहशत करण्यासाठी हे प्रकरण पुन्हा पुन्हा काढले जात आहे, अशी टीका थोरात यांनी यावेळी केली.

यावेळी थोरात म्हणाले, जगातील देश विविध पद्धतीने विकास साधत आहेत. अशावेळी आपल्या देशात दंगली होणे, तणाव निर्माण होणे हे दुर्दैवी आहे. समाजात तणाव निर्माण होणार नाही, ही सरकारची जबाबदारी आहे. कोणत्याही राज्यकर्त्याच्य काळात समाज आनंदी असला पाहिजे. राज्यात दंगली होतेय हे अभिमानाने सांगणार आहात का? सरकारने राजधर्म पाळल पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. कोणत्याही गुन्हेगाराची जात, धर्म पाहिली जाऊ नये. गुन्हेगाराची एकच जात गुन्हेगारी त्यामुळे त्याला शिक्षा झाली पाहिजे. परंतु यामध्ये भेदभाव केल जाऊ नये. राज्यात शांतता निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असेही थोरात म्हणाले. राज्यातील संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना अनुदानाचे पैसे मिळत नाही. सरकार म्हणून निराधार व्यक्तींना काही देऊ शकत नसाल तर तुम्ही काम करण्यास योग्य नाही. तुम्ही निराधारांचे पालनकर्ते नाहीत, अशी स्वतःची अर्थव्यवस्था करुन ठेवली. त्यामुळे कोणत्याही योजनेल पैसे नाहीत म्हणून सांगण्याचा अधिकार सरकारला नाही, अशी टीका थोरात यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात तुफान पाऊस! ‘या’ जिल्ह्यात रिपरीप वाढणार? हवामान खात्याचा ऑरेंज आणि येलो अलर्ट..

मुंबई | नगर सहयाद्री राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाने जोर धरला असून, पुढील २४...

पांडुरंगाचे दर्शन अधुरे राहिले, पंढरपूरला निघालेल्या वारकर्‍याचा मृत्यू, रस्त्यात काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पंढरपूरकडे पायी दिंडीसाठी निघालेल्या वारकर्‍यांपैकी एका वृध्द वारकर्‍याचा मृत्यू झाल्याची...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींवर बजरंग बली कृपा दर्शवणार, तुमची रास काय?

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील....

संग्राम जगताप यांची प्रखर हिंदुत्वाची भूमिका का?, वाचा इनसाईड स्टोरी..

इनसाईड स्टोरी : स्व. अरुणकाकांसह संग्राम जगताप यांच्या राजकीय वाटचालीत मुस्लिम मतपेढी कधी निर्णायक...