spot_img
ब्रेकिंगमनोज जरांगेंच्या उपोषणाच तिसरा दिवस; दोन जणांची तब्येत खालावली

मनोज जरांगेंच्या उपोषणाच तिसरा दिवस; दोन जणांची तब्येत खालावली

spot_img

अंतरवाली सराटी | नगर सह्याद्री:-
अंतरवाली सराटीतील दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून त्यांना पुढील उपचारासाठी आंतरवाली सराटीतून उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे हलवण्यात आलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. सोमवारी या आंदोलनाचा तिसरा दिवस असून मनोज जरांगे हे आंदोलनावर ठाम असल्याचं बघायला मिळत आहे. त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची तब्बेत खालावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यासह इतर आठ मागण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा सोमवारी तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्यभरातून आलेले काही मराठा बांधव आणि भगिनी देखील आमरण उपोषण साठी बसले आहे. तिसऱ्या दिवशी एका महिला उपोषणकर्त्याची तब्येत खालवली आहे. येरमाळा येथील मंदाकिनी बारकुल आणि बीड येथील भास्कर खांडे यांची तब्येत खालावली आहे.

दरम्यान या दोन्ही उपोषणकर्त्यांना उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आल आहे.मागील दोन दिवसात मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारचा कोणताही संपर्क झालेला नाही. सरकारचे प्रतिनिधी म्हणून अंबडच्या तहसीलदारांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. मात्र मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अनेक मराठा बांधव देखील अंतरवाली सराटीत आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुणबी प्रमाणपत्राबरोबरच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य केलं.

आमच्या पोरांना न्याय द्या
देशमुख कुटुंबाने उपोषणात सहभागी होण्याची गरज नाही ते दुःखात आहे. मीच या बाकी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडा म्हणून सांगितलं आहे. माझ्या शरीराच वाटोळे झालं. त्यांच्या व्हायला नको. आम्ही खुनशी नाही आमची कुणाला ना नाही. आम्ही काय दहशतवादी आहे का? आम्ही जातीयवादी नाही. आम्ही लोकांवर डुक धरत नाही आमची कुणाला ना नाही, सगळं देश इथे येऊन गेला आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलताना दिली. आमच्या लोकांचं वाटोळे होत आहे, हे फडणवीस यांनी बघितलं पाहिजे. आमच्या लेकरांना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...