spot_img
अहमदनगर'त्यांनी' कंटेनरला दुचाक्या आडव्या लावल्या अन्..; नगर-पुणे महामार्गावर धक्कादायक प्रकार

‘त्यांनी’ कंटेनरला दुचाक्या आडव्या लावल्या अन्..; नगर-पुणे महामार्गावर धक्कादायक प्रकार

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
रात्रीच्या वेळी वाहन चालकाला रस्त्यात अडवून मारहाण करत लुटल्याची घटना अहिल्यानगर-पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात असलेल्या भारत पेट्रोल पंपासमोर बुधवारी (19 मार्च) रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी केडगाव येथील तीन संशयितांना पहाटेच्या सुमारास पकडले. यात दोघा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याबाबत तोफिक शरीफ अन्सारी (वय 29, रा. झारखंड) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे बुधवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील कंटेनर घेवून पुण्याहून अहिल्यानगरच्या दिशेने येत असताना चास शिवारात दोन दुचाकीवरून तीन अनोळखी तरूण आले. त्यांनी भारत पेट्रोल पंपासमोर कंटेनरला दुचाक्या आडव्या लावून कंटेनर रस्त्याच्या कडेला थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर तिघांनी चालक अन्सारी यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत अन्सारी यांच्याकडील सात हजारांची रोकड तसेच कागदपत्रे असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेत तेथून पळून गेले.

जाताना त्यांनी कंटेनरच्या काचांवर दगड फेकून मारत त्या फोडून नुकसान केले. या घटनेनंतर कंटेनर चालक अन्सारी यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांच्या मदतीने नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधून लुटमारीची माहिती दिली. पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपींचा शोध सुरू केला. सदरचा गुन्हा केडगाव येथील तिघांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यांनी केडगावच्या एकनाथनगर येथील सनी धोत्रे व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संग्राम जगताप यांची प्रखर हिंदुत्वाची भूमिका का?, वाचा इनसाईड स्टोरी..

इनसाईड स्टोरी : स्व. अरुणकाकांसह संग्राम जगताप यांच्या राजकीय वाटचालीत मुस्लिम मतपेढी कधी निर्णायक...

मोठी बातमी! शरद पवारांची राज-उद्धव ठाकरेंना साथ, रोखठोक बोलले..

मुंबई । नगर सहयाद्री राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीतूनच त्रिभाषा सूत्र राबवण्याच्या निर्णयावरुन राज्यातील राजकारण चांगलेच...

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ‘या’ मुद्द्यावरून तापणार, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री राज्य विधिमंडळाचे यंदाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या...

राज्यात पावसाची रिपरिप वाढणार का?; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात येत्या पाच दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान...