spot_img
ब्रेकिंगAhmadnagar Politics: श्रेयासाठी 'ते' खोट्या बातम्या देता!! आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यानेच 'तो'...

Ahmadnagar Politics: श्रेयासाठी ‘ते’ खोट्या बातम्या देता!! आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यानेच ‘तो’ पूल

spot_img

‘यांनी’ साधला विरोधकांवर निशाणा

संगमनेर। नगर सहयाद्री-

शहरातील महत्त्वपूर्ण असलेल्या म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्याच प्रयत्नातून या पुलाचे काम सुरू होत आहे. मात्र ज्यांनी श्रेयासाठी पूलाचा निधी अडवण्याचा प्रयत्न केला ती मंडळी आता खोट्या बातम्या देऊन श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न करत असल्याची टीका शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर शहरातील प्रत्येक विकास कामासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनीच पाठपुरावा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन द्वारे 24 तास मिळणारे पाणी, नुकताच झालेला हॅपी हायवे यासह अनेक मोठमोठी विकास कामे राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहेत.

2022 मध्ये आलेल्या पुरामुळे म्हळुंगी नदीवरील पूल खाचला होता. त्यामुळे नागरिकांची जाण्या- येण्यासाठी गैरसोय झाली होती. यामुळे या पुलाचे काम तात्काळ व्हावे याकरता आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन या कामासाठी शाळेत निधी मिळावा अशी मागणी केली होती.

सर्व पक्षांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध असल्याने मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या कामाला साडेचार कोटींचा निधी दिला. मात्र हा निधी मिळू नये या कामी स्थानिक भाजपाने सत्ताधाऱ्यांनी मार्फत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला हे सर्वश्रुत आहे.

आता पुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याने हीच मंडळी श्रेयासाठी सरसावली आहे. त्यांनी एक तरी चांगले काम केले का ? याचे उदाहरण जनतेला दाखवले पाहिजे त्यामुळे त्यांनी दिलेल्या खोट्या बातम्यांना जनता कधी बळी पडणार नाही असेही निखिल पापडेजा यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...