spot_img
ब्रेकिंगAhmadnagar Politics: श्रेयासाठी 'ते' खोट्या बातम्या देता!! आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यानेच 'तो'...

Ahmadnagar Politics: श्रेयासाठी ‘ते’ खोट्या बातम्या देता!! आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यानेच ‘तो’ पूल

spot_img

‘यांनी’ साधला विरोधकांवर निशाणा

संगमनेर। नगर सहयाद्री-

शहरातील महत्त्वपूर्ण असलेल्या म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्याच प्रयत्नातून या पुलाचे काम सुरू होत आहे. मात्र ज्यांनी श्रेयासाठी पूलाचा निधी अडवण्याचा प्रयत्न केला ती मंडळी आता खोट्या बातम्या देऊन श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न करत असल्याची टीका शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर शहरातील प्रत्येक विकास कामासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनीच पाठपुरावा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन द्वारे 24 तास मिळणारे पाणी, नुकताच झालेला हॅपी हायवे यासह अनेक मोठमोठी विकास कामे राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहेत.

2022 मध्ये आलेल्या पुरामुळे म्हळुंगी नदीवरील पूल खाचला होता. त्यामुळे नागरिकांची जाण्या- येण्यासाठी गैरसोय झाली होती. यामुळे या पुलाचे काम तात्काळ व्हावे याकरता आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन या कामासाठी शाळेत निधी मिळावा अशी मागणी केली होती.

सर्व पक्षांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध असल्याने मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या कामाला साडेचार कोटींचा निधी दिला. मात्र हा निधी मिळू नये या कामी स्थानिक भाजपाने सत्ताधाऱ्यांनी मार्फत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला हे सर्वश्रुत आहे.

आता पुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याने हीच मंडळी श्रेयासाठी सरसावली आहे. त्यांनी एक तरी चांगले काम केले का ? याचे उदाहरण जनतेला दाखवले पाहिजे त्यामुळे त्यांनी दिलेल्या खोट्या बातम्यांना जनता कधी बळी पडणार नाही असेही निखिल पापडेजा यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...