spot_img
महाराष्ट्रउन्हापासून दिलासा मिळणार, पाऊस हजेरी लावणार! जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान..

उन्हापासून दिलासा मिळणार, पाऊस हजेरी लावणार! जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान..

spot_img

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा तडाखा कायम असतानाच काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील उत्तर भाग, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच, राज्यात वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी पर्यंत राहू शकतो.

सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागांत उन्हाळ्याचा जोर वाढला आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटा तीव्र होत असून, तापमान चाळीशीपार गेले आहे. मात्र, पश्चिमी झंझावाताच्या प्रभावामुळे हवामानात बदल होत आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

जळगाव, धुळे, नंदूरबार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरणासोबत हलका पाऊस पडू शकतो. तसेच, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानाचा तीव्र दाह अनुभवणाऱ्या नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.राज्यात अनेक भागांत हवामान ढगाळ असताना मुंबईत मात्र कोरड्या वाऱ्यांची सरशी राहणार आहे.

पुढील 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांत तापमान किमान 26 ते 27 अंशांदरम्यान राहू शकते, तर दुपारी कमाल तापमान 36 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. वास्तविक उष्णतेची तीव्रता 38 अंशांपर्यंत जाणार असल्याने मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. सध्याच्या हवामान स्थितीनुसार, राज्यात उन्हाचा तडाखा कायम राहणार असला तरी काही भागांत पावसाचे सावट दिसून येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....