spot_img
अहमदनगरनगरमध्ये ‘एक मराठा, लाख मराठा’ चा होणार जयघोष! मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत...

नगरमध्ये ‘एक मराठा, लाख मराठा’ चा होणार जयघोष! मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत ‘या’ तारखेला निघणार रॅली

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला महाराष्ट्रभर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. येत्या सोमवारी (१२ ऑगस्ट) मनोज जरांगे पाटील नगर शहरात येणार असून, नगरमध्ये भव्य शांतता रॅली आयोजित करण्यात आली आहे. केडगाव येथे या रॅलीचे स्वागत होणार असून, माळीवाडा बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली सुरू होईल. रॅली नगर शहरात सुमारे साडेसहा किलोमीटर अंतर पार करून चौपाटी कारंजा येथे सांगता होणार आहे.

सुमारे पाच हजार स्वयंसेवक नियोजन व व्यवस्था करत आहेत. नगर जिल्ह्यासह शेजारील बीड, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यातून लाखो समाजबांधव शहराच्या रॅलीत सहभागी होणार आहेत.गरच्या अखंड समाजाच्या वतीने बेलवंडी फाटा येथे जिल्ह्यात त्यांचे स्वागत होईल. तेथून सुमारे चारशे चारचाकी व एक हजार दुचाकी त्यांच्या यात्रेत सहभागी होतील.

नगरकडे येताना सुपा येथेही स्वागत होईल व तेथून केडगाव येथे शहरात स्वागत होईल.केडगाव येथे स्वागत-कायनेटिक चौक-सक्कर चौक, माळीवाडा बसस्थानक मार्केट यार्ड चौक, माळीवाडा वेस, पंचपीर चावडी, आशा टॉकीज चौक, माणिक चौक, कापड बाजार, तेलिसुंट, चितळे रोड मार्गे चौपाटी कारंजा येथे येणार आहे. केडगाव येथे नेमाने इस्टेट, कल्याण रस्त्यावर फटाका मार्केट भरणारी जागा, शहरात क्लेरा ब्रूस मैदान न्यू आर्टस् कॉलेज,सावेडीत सारडा कॉलेज अशा विविध ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...