spot_img
ब्रेकिंग…तर मग OBC च सगळच आरक्षण उडेल, नेमका काय आहे कायदा? मनोज...

…तर मग OBC च सगळच आरक्षण उडेल, नेमका काय आहे कायदा? मनोज जरांगे नेमके काय म्हणतायेत? पहा..

spot_img

जालना / नगर सह्याद्री : मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठे आंदोलन उभारले. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले हे की, “आतापर्यंत या आंदोलनामुळे 57 लाख नोंदी सापडल्या आहेत.

60 लाख गोरगरीब मराठ्यांच कल्याण झालेलं आहे. मग 75 वर्षात हे का नाही झालं? आता श्रेय घेण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. 39 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र मिळालय. हे आंदोलनाच यश नाही का? गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी हे आंदोलन आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “2000-2001 चा कायदा ओबीसींना आरक्षण देतो. त्यात नव्या व्याख्येचा समावेश करायचा असेल, तर कायदा दुरुस्त करावा लागतो. 2001 चा कायदा ओबीसींना आरक्षण देतो.

2004, 2006, 2008, 2012 आणि 2014 मध्ये कायद्यात दुरुस्ती 2001 च्या कायद्याच्या आधारावर झालीय. नवीन काही असेल तर शासन निर्णय घ्यावा लागते. सग्या-सोयऱ्यांसाठी शासन निर्णय घेतला असता, तर आरक्षण उडालं असतं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

* कस उडू शकते सगळ्यांचे आरक्षण ?
मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायच आहे. मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत, तर दुरुस्ती 2001 च्या कायद्यात झाली पाहिजे, तर त्या कायद्याला चॅलेंज होणार नाही. आपल चॅलेंज झालं, तर ओबीसींच सगळ आरक्षण उडेल. कारण आपण कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात आहोत. आपल उडणार असेल, तर त्यांच सुद्धा 2001 चा कायदा, 1967 चा कायदा आणि 1990 च्या मंडल कायद्यानुसार सगळ उडतय, त्यांचं काही राहत नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर महापालिकेची राज्यात पाचव्या क्रमांकावर झेप; काय घडलं पहा…

सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी लवकरच रुग्णालय सुरू होणार : आयुक्त तथा प्रशासक...

कामाचे बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच; पारनेरचे तिघे अडकले जाळ्यात

  अहिल्यानगर / नगर सह्याद्री - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात पारनेर पंचायत समितीचे अधिकारी...

बांगलादेशात भूकंप, 6 जणांचा मृत्यू, 200 जखमी; काय काय घडलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - बांगलादेशमध्ये आज (21 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजून 8 मिनिटांनी...

कृषिकन्या श्रद्धा ढवणला राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार

उत्कृष्ट दुग्ध उत्पादन व आधुनिक व्यवस्थापनाची देशपातळीवर दखल पारनेर : नगर सह्याद्री केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन...