spot_img
ब्रेकिंग..तर पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार; जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा

..तर पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार; जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा

spot_img

Manoj Jarange Patil News: जर सरकार आपल्यावर अन्याय करणार असेल, चारही बाजूंनी मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असेल आणि हक्काचं आरक्षण देण्यास टाळाटाळ करत असेल, तर आम्हाला पाडापाडीचा निर्णय घ्यावा लागणार आहे, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. तसेच २९ तारखेला या मुद्द्यावर निर्णय होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पुढे बोलतांना जरांगे पाटील म्हणाले, “गर्वाला कधी वाढ नसते, कधी ना कधी संपतोच. लोकसभेला जे झालं त्यापेक्षा विधानसभेत ५ पटीने होईल. मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व सरकारला आला आहे. मराठा कुणबी एकच आहे,

मराठ्यांवर जाणूनबुजून अन्याय केला जात आहे. सारथीच्या कोणत्या सवलती आम्हाला कामी येतात? सगळ्या मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं, मग फी का घेतली जाते? मी पावत्या देतो. अर्धवट गुंतवणूक ठेवली जाते. प्रवेशासाठी पैसे घेतले जातात. त्यामुळे सरकारवर सर्व समाजातील लोक नाराज झाले आहेत,” असं त्यांनी सांगितलं.शरद पवार यांच्या मतांचा विचार करण्यापेक्षा, माझं मन, माझे विचार काय सांगत आहेत, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.

मराठ्यांचे कल्याण व्हावं, तसंच लिंगायत, धनगर, मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळायला हवं, ही प्रामाणिक भावना आहे. बारा बलुतेदारांची वेगळ्या प्रवर्गाची मागणी आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. परिणाम काहीही झाले, सर्व जातीधर्माला आरक्षण दिलं पाहिजे. वेळ पडली तर सर्वांना एकत्र येत विधानसभेत जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, लोकांचा आक्रोश आणि संतापाची लाट कशासाठी आहे, इतका जोर का धरला जात आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे.मराठ्यांच्या आरक्षणावर समाधानकारक तोडगा कसा काढायचा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही, हे सरकारला कळायला हवं. उगाच डिवचण्याचा प्रयत्न केला तर परिणाम वेगळ्या दिशेला जातील. विधानसभेचं दार आतून बंद केलं आहे, ते उघडावं लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...