spot_img
अहमदनगर'त्यांना' दिल्लीच्या जनतेने जागा दाखविली; मंत्री विखे पाटील

‘त्यांना’ दिल्लीच्या जनतेने जागा दाखविली; मंत्री विखे पाटील

spot_img

लोणी | नगर सह्याद्री
भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला एैतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा असून, पद्मविभूषण डॉ.आण्णासाहेब हजारे यांच्याशी प्रतारणा करणा-यांना दिल्लीच्या जनतेने त्यांची जागा दाखविली असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

दिल्ली मध्ये भारतीय जनता पक्षाला 27 वर्षांनंतर मिळालेल्या विजयानंतर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या मंत्राला दिल्लीच्या जनतेने दिलेले हे समर्थन आहे. या निवडणूकीतील विजयाचे चाणक्य केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या  यशस्वी रणनितीला जनतेने साथ दिली. या विजयाबद्दल मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करुन, विकास प्रक्रीयेच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार जनतेने केला होता, त्याचे विजयात रुपांतर झाल्याचे त्यांनी सांगितले.

आम आदमी पक्षाच्या भ्रष्ट्राचारी राजवटीला जनता कंटाळली होती. लोकांच्या नावाखाली योजना तयार करुन, त्यातील स्वाथपणा हा जनतेनेच मतदानाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला. याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले की, जेष्ठ समाजसेवक पद्मविभूषण डॉ. आण्णासाहेब हजारे यांच्या नावाचा उपयोग करुन, अरविंद केजरीवाल यांनी व्यक्तिगत राजकारणाला महत्व दिले. त्यांच्या विचारांशी केलेल्या प्रतारणेला जनतेनेच त्यांचा पराभव करुन उत्तर दिले असल्याकडे मंत्री विखे पाटील यांनी लक्ष वेधले.

मागील काही दिवसात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने मतदान यादीतील आकडेवारीवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रीयेची खिल्ली उडवून मंत्री विखे पाटील म्हणाले की, आता तरी राहुल गांधी यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. दिल्लीच्या जनतेने कॉग्रेसला सपशेल नाकारले आहे. परदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करणा-यांना जनता थारा देत नाही हे दिल्लीच्या निकालाने काँग्रेसला दाखवून दिले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....

आजचे राशी भविष्य! ‘या’ चार राशींसाठी आजचा दिवस अवघड, वाचा तुमचे आजचे राशी भविष्य

मुंबई। नगर सहयाद्री मेष राशी भविष्य अनपेक्षितपणे प्रवास करावा लागल्यामुळे दमून जाल. तेलाने मसाज करून शरीराच्या...