spot_img
ब्रेकिंगवातावरण बिघडलं! रखरखत्या उन्हाळ्यात पावसाचा तडाखा बसणार, हवामान खात्याची महत्वाची अपडेट..

वातावरण बिघडलं! रखरखत्या उन्हाळ्यात पावसाचा तडाखा बसणार, हवामान खात्याची महत्वाची अपडेट..

spot_img

Weather Update: फेब्रुवारी महिन्यापासून उष्णतेच्या लाटा जाणवू लागल्या आहेत. मार्च महिन्यात तर काही ठिकाणी पारा ४१ अंश पार गेला आहे. कुठे उन्हाच्या झळा तर, कुठे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 22 आणि 23 मार्च रोजी 8 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणातील काही भागांत उष्णतेची लाट जाणवणार असून काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

देशभरात हवामान वेगाने बदलत असून महाराष्ट्रातही त्याचा परिणाम जाणवत आहे. दक्षिणेकडून पश्चिम बंगालच्या खाडीत आणि गुजरातच्या दिशेने तीन सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झाल्यामुळे हवामान अस्थिर झाले आहे. याचा प्रभाव महाराष्ट्रावरही दिसून येत असून काही भागांत पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांत 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. सोबतच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट असून पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा अधिक जाणवणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अधिक जाणवणार आहे. येथे पुढील काही दिवस तापमान वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

दुसरीकडे, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या 8 जिल्ह्यांसाठी 22-23 मार्च रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या भागांत जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...