दिल्ली वृत्तसंस्था:-
हवामान पुन्हा एकदा बदललं आहे. हिमालयीन प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. सखल भागात पाऊस सुरू झाला आहे. बद्रीनाथ धाममध्ये दोन दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. यादरम्यान, एक मोठी माहिती समोर आली आहे.
आज शुक्रवारी दुपारी बर्फवृष्टीमुळे येथे मोठी आपत्ती आली. मुसळधार बर्फवृष्टीनंतर मोठा हिमकडा कोसळला आहे. या दुर्घटनेत ५७ कामगार बर्फाखाली अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे. तर १६ कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे.
प्रशासन आणि बीआरओ टीमला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद सुमन यांनी सांगितले की, बर्फ पडल्यानंतर ५७ कामगार गाडले गेले. तथापि, १० जणांना वाचवण्यात यश आले आहे.
अपघाताच्या वेळी एका खाजगी कंत्राटदाराचे कामगार मोठ्या संख्येने घटनास्थळी काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्वजण बीआरओ कराराखाली काम करणाऱ्या कंत्राटदाराचे कामगार होते. जेव्हा हिमस्खलन झाले तेव्हा सर्वजण इकडे तिकडे धावू लागले. त्यापैकी काही जण वाचण्यात जाण्यात यशस्वी झाले, तर ५७ कामगार बर्फात अडकले.