spot_img
अहमदनगरजिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट..! टँकरची संख्या १५० पार

जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट..! टँकरची संख्या १५० पार

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
उन्हाच्या चढत्या पार्‍याबरोबर जिल्ह्यातील तहानेचा ताण देखील वाढू लागला आहे. जिल्ह्यात १४८ गावे आणि ७८३ वाड्यावस्त्यावरील ३ लाख ५ हजार ८६६ इतया लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने १४९ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. अजूनही बरीच गावे, वाड्या वस्त्यांना टँकेरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी होत आहे. त्यामुळे टँकरचा आकडा २०० पार जाण्याची शक्यता आहे.

यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती लवकरच जाणवू लागली. त्यातच उन्हाच्या चढत्या पार्‍यामुळे पाणीसाठ्यांचा जलस्तर झपाट्याने खाली जाऊ लागला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणार्‍या गावांची आणि वाड्याची संख्या एप्रिल येता-येता लक्षणीय वाढली.

एकीकडे लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने घोषित केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली आणि नियंत्रणाखाली लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे जात असतानाच दुसरीकडे दैनंदिन कामकाज आणि टंचाईच्या उपाययोजनांची प्रशासनाच्या वतीने दक्षता घेतली जात आहे.

स्थानिक पातळीवरील यंत्रणेने टंचाई परिस्थितीवर गांभीर्याने काम करावे, आवश्यकतेनुसार पिण्याचे पाण्याचा पुरवठा करावा, टँकरचे प्रस्ताव प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकारी यांच्याकडे आहेत. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात टँकरची संख्या १०० झाली होती. जिल्ह्यात १४८ गावे आणि ७८३ वाड्यावर त्यावरील तब्बल तीन लाख ५ हजार ८६६ इतया लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी १४९ टँकर सुरु आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात बिबट्याची भीती; गावांना दिवसा वीज पुरवठा करावा

माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांची महावितरणकडे मागणी सुनील चोभे | नगर सह्याद्री गेल्या...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...