spot_img
ब्रेकिंगप्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींच आघाडीवर..  

प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींच आघाडीवर..  

spot_img

पुणे | नगर सह्याद्री
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ९३.३७ टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात २.१२ टक्क्याने वाढ झालेली आहे. यंदाही निकालात मुलांपेक्षा मुलीच अव्वल ठरल्या आहेत.

बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षी राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल २५ मे रोजी जाहीर केला होता. यंदा त्या तुलनेत चार दिवस आधीच निकाल जाहीर करण्यात आला आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला आहे. यावेळी सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर उपस्थित होते. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल ९७.५१ टक्के. सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा निकाल ९१.९५ टक्के आहे.बारावीच्या परिक्षेमध्ये मुलींचा निकाल ९५.४४ टक्के तर मुलांचा निकाल ९१.६० टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा ३.८४ टक्के ने अधिक आहे.

विभागनिहाय निकाल
* पुणे – ९४.४४
* नागपुर -९२.१२
* संभाजीनगर – ९४.०८
* मुंबई – ९१.९५
* कोल्हापूर -९४.२४
* अमरावती -९३
* नाशिक -९४.७१
* लातूर – ९२.३६
* कोकण -९७.५१

‘या’ संकेतस्थळावर पाहता येणार निकाल?
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar Crime: १० तोळ्यांच्या दागिन्यांसह मेकॅनिक रेहान अडकला जाळ्यात; अल्पवयीन मुलीसोबत केलेला प्रकार भोवला?

Ahmednagar Crime: सोशल मीडियावर केलेली चॅटींग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीकडून सुमारे...

Ahmednagar News: आमदार ‘आरोपी’ चे ‘बॉस? काही तर बिल्ला लाऊनच फिरतात; भाजप नेत्याने थेट अजित पवार गटाच्या आमदारावर निशाणा साधला

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती....

Ahmednagar News: नगर जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ! दोन तरुणांवर भल्या पहाटे हल्ला?

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात...

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा, अन्यथा… आज कुणाच्या राशीत काय?

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन...