spot_img
ब्रेकिंगविधानसभेत गरजला पारनेरकरांचा आवाज! आ. दाते यांनी मांडला ‘तो’ प्रश्न; वेधले शासनाचे...

विधानसभेत गरजला पारनेरकरांचा आवाज! आ. दाते यांनी मांडला ‘तो’ प्रश्न; वेधले शासनाचे लक्ष

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री :-
पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागात दि २७ मे रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नगर तालुयातील वाळुंबा नदीला आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले असून, यामध्ये रस्ते, शेती, पिके, जनावरे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार काशिनाथ दाते यांनी महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनात नियम २९३ अंतर्गत प्रस्ताव मांडत शासनाचे लक्ष वेधले.

महापुरामुळे अनेक गावांमध्ये नागरिक अडकून पडले होते. आमदार काशिनाथ दाते यांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन स्थानिक  नागरीकांची मदत व प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, जलसाठे, रस्ते व शेतजमीनीचे नुकसान होऊन परीसरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक नुकसान झाल्याचे विदारक चित्र निर्माण झालेले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी  दुसर्‍याच दिवशी महापूरग्रस्त भागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी संबंधित विभागांना तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सर्व विभागांनी अहवाल व झालेल्या नुकसानीची आकडेवारीही सादर केली असून, परीस्थिती पुर्ववत करण्याच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक असलेल्या उपाययोजनांची माहितीही शासनाकडे पाठवण्यात आलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना आमदार दाते म्हणाले की, शहरांमधील मेट्रो, रस्ते आदी निर्माण करण्यासाठी ज्या प्रकारे चालना दिली जाते, त्याच प्रकारे ग्रामीण विकासाला देखील चालना देणे आवश्यक आहे. वेगवेगळे महामार्ग बनवताना त्या महामार्गांना जोडल्या जाणार्‍या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्ती व निर्मितीवरही भर देणे आवश्यक आहे, ज्यामुळे शहर व ग्रामीण विकासात तफावत निर्माण होणार नाही. ग्रामीण व शहरी अशा दोनही भागांचा समतोल विकास साधण आवश्यक आहे.
 
अतिवृष्टीमुळे मतदारसंघात मोठे नुकसान
अतिवृष्टीमुळे माझ्या मतदारसंघातील शेतीसह,रस्ते,पूल, सी.डी.वर्कचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालकमंत्री विखे यांनी तत्परतेने नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकर्‍यांच्या नुकसानाची शासनाने दखल घेतली पाहिजे.
–  आमदार काशिनाथ दाते 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात हळहळ! दुर्घटनेत १७ जणांचा अंत, काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही...

तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांचा खर्चपाणी तिथूनच चालतो, ते तुम्हाला काय पाणी देणार?, माजी खासदार विखेंची खासदार लंके यांच्यावर टीका!

कान्हूरपठार। नगर सहयाद्री:-  पठार भागाला पाणी मीच देणार, असे आश्वासन माजी खासदार सुजय विखे पाटील...

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, सरकार सावध, विखे पाटील म्हणाले, आम्ही…

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने...

सासऱ्यासह पत्नीवर कोयत्याने सपासप वार; सावेडी उपनगरात दारुड्या पतीचा भयंकर कांड

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील वैदुवाडी येथे दारुच्या नशेत पती अर्जुन राजू शिंदे याने...