spot_img
अहमदनगरगाव सुटल.. अन मोठा अधिकारी होऊनच परतला! शेतकरी पुत्राचा डोळ्यात पाणी आणणारा...

गाव सुटल.. अन मोठा अधिकारी होऊनच परतला! शेतकरी पुत्राचा डोळ्यात पाणी आणणारा प्रवास..

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री-
तालुक्यातील हिवरे कोरडा येथील शेतकरी पुत्र राहुल बाबासाहेब कोरडे यांने काही तरी करून दाखवायचे या हेतूनं गाव सोडलं होत. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारत आपल्या स्वप्नाला गवसणी घातली आहे. त्यामुळे या जिद्द व चिकाटीच्या बळावर मिळालेल्या या यशाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

जिद्द असेल तर परिस्थितीला ही वाकवता येते. असणारे दिवस पलटवता येतात व स्वप्न साकार करता येते असे म्हटले जाते. पण यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राहूल कोरडे आहे. पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा हा भाग तसा दुष्काळी आहे.

अनेक तरुण हे शिक्षण नोकरीसाठी स्थित्यंतर करतात. त्यातीलच एक तरुण राहुल पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न घेऊन बाहेर पडला होता. पुण्यात जाऊन त्याने स्पर्धा परीक्षा दिल्या. घरच्यांनी दिलेली साथ आणि त्यांचा कष्टाला त्याने यश मिळून दिले.

हार न मानता यशाला गवसणी घातली व पोलीस उपनिरीक्षक या पदावर त्याने त्याचा ठसा उमटवला आहे. या यशात त्याला त्याचे आजी आजोबा वडील, आई ,भाऊ ,बहीण, यांची मोलाची साथ मिळाली. त्याच्या यशाबद्दल हिवरे कोरडेकरांनी गावात जय्यत स्वागताची तयारी करत मोठ्या आनंदात मिरवणूक देखील काढली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...