spot_img
ब्रेकिंगसासुरवाडीने काढला जावयाचा काटा! घरगुती वादात कुऱ्हाडीने वार नंतर...

सासुरवाडीने काढला जावयाचा काटा! घरगुती वादात कुऱ्हाडीने वार नंतर…

spot_img
Maharashtra Crime : कौटुंबिक वादाचे रूपांतर हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नातेसंबंधातील वाद मिटवण्यासाठी सासुरवाडीत गेलेल्या एका तरुणाची सासरच्या नातेवाइकांनी निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सदरचा प्रकार अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अंबाशी गावात घडला.  
हत्येची शिकार झालेल्या तरुणाचे नाव नागेश गोपनारायण असे आहे. तो आपल्या पत्नीच्या माहेरी, अंबाशी गावात वाद मिटवण्यासाठी गेला होता. मात्र वाद मिटवण्याच्या प्रयत्नातच शाब्दिक चकमक होऊन त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी काही नातेवाइकांनी नागेशवर काठ्या, चाकू आणि कुऱ्हाडीने सपासप वार केले.
या हल्ल्यात नागेश गंभीर जखमी झाला. अतिरक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, चान्नी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सिद्धार्थ शांताराम चोटमल, रेखा शांताराम चोटमल, नंदा दिलीप डोंगरे यांना अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पारनेरमध्ये उलथापालथ; उपमुख्यमंत्री पारनेरमध्ये; कोण कोण करणार प्रवेश पहा

पदाधिकार्‍यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती | सुजित झावरे पाटील यांचा शिवसेत पक्षप्रवेश पारनेर / नगर...

किरण काळे यांचे आरोप बिनबुडाचे, निराधार; जैन मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सुभाष मुथ्था काय म्हणाले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगरमधील जैन मंदिर ट्रस्टची जागा हडपल्याचा उबाठाचे किरण काळे यांनी केलेला...

अतिवृष्टीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा, कुठे केली पाहणी पहा

ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीचा घेतला सविस्तर आढावा अहिल्यानगर / नगर सह्याद्री जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या...

सोलर पॅनल बसवण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पावणेतीन लाखांचा गंडा;

माजी सैनिकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री 'प्रधानमंत्री सूर्य घर योजने'अंतर्गत सोलर पॅनल...