spot_img
अहमदनगरठाकरे गटाला धक्के पे धक्का! 'दिग्गज' नेता साथ सोडणार?

ठाकरे गटाला धक्के पे धक्का! ‘दिग्गज’ नेता साथ सोडणार?

spot_img

Maharashtra Politics:विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. ठाकरे गटातून अनेक नेते शिंदेंच्या शिवसेनेत जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणातील काही नेत्यांनी ठाकरे गाटाला राम राम केला होता. मुंबई, छत्रपतीसंभाजीनगरातूनही अनेक जणांनी ठाकरेंची साथ सोडली होती. आता यामध्ये आणखी भर पडली आहे. रत्निगरी जिल्ह्यातही ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे.

माजी आमदार सुभाष बने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाची तारीखही ठरली आहे. त्याशिवाय रोहन बने सुभाष बने, गणपत कदम यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ फेब्रुवारी रोजी कोकणाच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी रत्नागिरीमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने आणि सुभाष बने देखील मशाल सोडून हातात धनुष्यबाण घेणार आहत. सुभाष बने यांची संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा तालुक्यातल्या काही भागात मोठी ताकद आहे. त्याचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा फायदा होईल, असे म्हटले जातेय. त्याशिवाय माजी आमदार गणपत कदम यांचा देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश निश्चित झालाय. कदम हे राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. माजी आमदार राजन साळवी हे ठाकरे गटात नाराज असल्याचे सांगितले जातेय, ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. साळवी यांच्या पक्षप्रवेशाचाही मुहूर्त ठरल्याची माहिती हाती आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...