spot_img
अहमदनगरशाळा हादरली! बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून; मृतदेह पाहून अनेकांचा थरकाप उडाला..

शाळा हादरली! बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून; मृतदेह पाहून अनेकांचा थरकाप उडाला..

spot_img

Maharashtra Crime: राज्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख सुरुच आहे. राज्यात प्रसिद्ध असलेल्या बारामतीमध्ये काही दिवसांपूर्वीच एका शाळेतील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. सदरच्या प्रकरणात दोघींना दारु पाजून चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले होते. आता पुन्हा बारामतीमधील एका शाळेत भयंकर घटना घडली आहे.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सकाळी सदरचा प्रकार उघडकीस आला. हा खून कोणत्या कारणातून करण्यात आला याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. मात्र, या विद्यार्थ्यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांचा मृतदेह पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. बारामतीच्या विद्यालयामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...