spot_img
अहमदनगरअर्थसंकल्पातील 'तो' कर लावण्याचा प्रस्ताव अन्यायकारक ; आमदार तांबेंनी सरकारला धरले धारेवर

अर्थसंकल्पातील ‘तो’ कर लावण्याचा प्रस्ताव अन्यायकारक ; आमदार तांबेंनी सरकारला धरले धारेवर

spot_img

संगमनेर। नगर सहयाद्री:-
जगभरासह देशात ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक कारची मागणी वेग धरू लागली असताना महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक गाड्यांच्या मागणीला ब्रक लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समोर येत आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात ३० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६ टक्के मोटार वाहन कर लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या निर्णयाला आमदार सत्यजीत तांबे यांनी जोरदार विरोध केला असून, हा कर अन्यायकारक असल्याचा आरोप केला आहे.

आ. तांबे यांनी विधीमंडळात सरकारला प्रश्न विचारला की, देशातील इतर कोणत्याच राज्यात इलेक्ट्रिक वाहनांवर कर नाही, मग महाराष्ट्रातच का? तसेच, केंद्र सरकार प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे, अशा स्थितीत महाराष्ट्र सरकारने कर लावणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला विरोध करण्यासारखे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत इलेक्ट्रिक वाहनांवर कोणताही कर लावलेला नव्हता. मात्र, नव्या निर्णयामुळे ही वाहने ६ टक्क्यांनी महाग होणार आहेत. महाराष्ट्रातील ऑटोमोबाईल उद्योग मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे, त्यामुळे या निर्णयाचा उद्योगावरही परिणाम होईल, असे आ. तांबे यांनी सांगितले. तसेच, राज्यात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची सुविधा अपुरी आहे. केवळ मुंबई महापालिकेने पार्किंगमध्ये चार्जिंग पॉइंट सक्तीचे केले असले तरी इतर ठिकाणी चार्जिंग स्टेशन नाहीत. अशा परिस्थितीत सरकार या करातून चार्जिंग सुविधांचा विकास करणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...