spot_img
अहमदनगर'जी एस महानगर' बॅंकेची सत्ता योग्य व्यक्तीच्या हातात!, गीतांजलीताई शेळके यांचा मुंबईत...

‘जी एस महानगर’ बॅंकेची सत्ता योग्य व्यक्तीच्या हातात!, गीतांजलीताई शेळके यांचा मुंबईत सत्कार

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री
जी एस महानगर बॅंकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मुंबानगरीत फार मोठा आधार मिळाला असून या बॅंकेची सत्ता योग्य व्यक्तीच्या हाती आली असल्याचे समाधान मुंबई येथील पारनेर तालुक्यातील स्थायीक जनतेला असल्याचे मत ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब आहेर यांनी व्यक्त केले आहे. जी एस महानगर बॅंकेच्या चेअरमन गीतांजली ताई शेळके यांचा मुंबई येथील पारनेर तालुका युवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी गणपत वाफारे, भाऊ गोडसे, अरविंद वाढवणे, शशिकांत गाडगे, तुकाराम कदम, जालिंदर खोसे, महादू गाडगे, दादाभाऊ रेपाळे, अनिल शेळके, उद्धव वाफारे,शुभम आहेर आदी उपस्थित होते. आहेर सर म्हणाले, गेली दोन वर्षात जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब व माजी अध्यक्ष उदयजी शेळके यांच्या विचारांचे अनुकरण न करता बॅंकेच्या कारभारात हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू होता.

याचा फटका अधिकारी, कर्मचारी व बॅंकेच्या कारभारात भरीव योगदान देणाऱ्या आजी माजी संचालक, आजी माजी पदाधिकारी यांना मोठ्या प्रमाणात बसला. जी एस महानगर बॅंकेच्या चेअरमन गीतांजली ताई शेळके यांनी गेली दोन वर्षात जिल्हा सहकारी बँक असो की जी एस महानगर बॅंकेच्या माध्यमातून सहकार चळवळीत काम करताना बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके व माजी अध्यक्ष उदय शेळके साहेब यांच्या विचाराचे अनुकरण केले याची जाणीव सभासदांना झाली म्हणून संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब पॅनलच्या सर्वेसर्वा गीतांजली ताई शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ दहा हजार मतांच्या फरकाने निवडून आले. पाच हजार कोटींचा टप्पा व शंभर शाखा लवकरच होतील अशी खात्री आहेर सर यांनी व्यक्त केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...