spot_img
राजकारणशिंदे-जरांगेंमधील कराराने २ बळी घेतले, एक भाजप व दुसरा म्हणजे...प्रकाश आंबेडकरांचा मोठा...

शिंदे-जरांगेंमधील कराराने २ बळी घेतले, एक भाजप व दुसरा म्हणजे…प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश आले. मुंबईत घुसण्यापूर्वीच जरांगे यांच्या मागण्या मान्य करत शिंदे सरकारने पुढील काही गोष्टी घडण्याच्या टाळल्या.

राठा आंदोलनातून यशस्वी मार्ग काढल्यामुळे एकनाथ शिंदेंचं कौतुक होत असताना सत्ताधारी महायुतीतीलच काही नेत्यांच्या विरोधाचाही त्यांना सामना करावा लागत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी या आपली भूमिका मांडत खळबळजनक दावा केलाय.

ते म्हणाले आहेत की, “मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कराराने दोन बळी घेतले आहेत असं मी मानतो. एक बळी भाजपचा गेला आहे आणि दुसरा जे सरंजामी पुढारी होते, ज्यांनी भूमिका घेतल्या नाहीत, ते आता बोल्ड आऊट झाले आहेत,” असा दावा त्यांनी केलाय.

आंबेडकर म्हणाले की, “एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यात जो समझोता झाला. त्या समझोत्यामुळे ओबीसींचा असा समज झाला आहे की, भाजपने आम्हाला फसवलं आहे. धर्माचा प्रचार करून आमची मत त्यांनी घेतली. पण, आमचे रक्षण भाजपने केले नाही. म्हणून, ओबीसी पूर्णपणे भाजपपासून तुटलेला आहे,” असं मत प्रकाश आंबेडकरांनी मांडलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींच्या खात्यात भाऊबीजेची ओवाळणी? ऑक्टोबरचा हप्ताकडे साऱ्यांचे लक्ष!

मुंबई। नगर सहयाद्री:- महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेत लाभार्थींना सप्टेंबर महिन्याचा ₹१५०० चा...

आमदार शिवाजी कर्डीले यांचे निधन, ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना मिळणार नशिबाची साथ तर ‘त्या’ राशीला बसणार आर्थिक फटका, जाणून घ्या सविस्तर

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल,...

मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी; GR बाबतच्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान, उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठा...