spot_img
राजकारणशिंदे-जरांगेंमधील कराराने २ बळी घेतले, एक भाजप व दुसरा म्हणजे...प्रकाश आंबेडकरांचा मोठा...

शिंदे-जरांगेंमधील कराराने २ बळी घेतले, एक भाजप व दुसरा म्हणजे…प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश आले. मुंबईत घुसण्यापूर्वीच जरांगे यांच्या मागण्या मान्य करत शिंदे सरकारने पुढील काही गोष्टी घडण्याच्या टाळल्या.

राठा आंदोलनातून यशस्वी मार्ग काढल्यामुळे एकनाथ शिंदेंचं कौतुक होत असताना सत्ताधारी महायुतीतीलच काही नेत्यांच्या विरोधाचाही त्यांना सामना करावा लागत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी या आपली भूमिका मांडत खळबळजनक दावा केलाय.

ते म्हणाले आहेत की, “मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कराराने दोन बळी घेतले आहेत असं मी मानतो. एक बळी भाजपचा गेला आहे आणि दुसरा जे सरंजामी पुढारी होते, ज्यांनी भूमिका घेतल्या नाहीत, ते आता बोल्ड आऊट झाले आहेत,” असा दावा त्यांनी केलाय.

आंबेडकर म्हणाले की, “एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यात जो समझोता झाला. त्या समझोत्यामुळे ओबीसींचा असा समज झाला आहे की, भाजपने आम्हाला फसवलं आहे. धर्माचा प्रचार करून आमची मत त्यांनी घेतली. पण, आमचे रक्षण भाजपने केले नाही. म्हणून, ओबीसी पूर्णपणे भाजपपासून तुटलेला आहे,” असं मत प्रकाश आंबेडकरांनी मांडलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान कोसळले

नगर सह्याद्री वेब टीम Tejas fighter jet crashes: दुबईमध्ये एअर शो प्रात्यशिकात भाग घेतलेल्या तेजस...

आमदार-खासदारांशी कसं वागणार? सरकारचा कर्मचाऱ्यांना ९ कलमी कार्यक्रम…

आमदार-खासदारांच्या पत्रांना दोन महिन्यांत उत्तर देण्याचं अनिवार्य केलंय / नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई...

कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड; सयाजी शिंदे सरकारवरसंतापले? आम्ही मरायलाही तयार…

मुंबई / नगर सह्याद्री - सयाजी शिंदे हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी मराठी,...

रिक्षा थांबविण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री येथील माळीवाडा बस स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्याच्या किरकोळ वादातून दोन आरोपींनी...