spot_img
देशलोकसभेत विरोधकांचा तुफान राडा; कारण आलं समोर..

लोकसभेत विरोधकांचा तुफान राडा; कारण आलं समोर..

spot_img

नवी दिल्ली | वृत्तसंस्था
वक्फच्या सुधारणा विधेयकावरुन लोकसभेत विरोधी पक्षांनी तुफान राडा केला. ज्यामुळे लोकसभेचे कामकाज हे सुरुवातीला 15 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं तर त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत हे कामकाज स्थगित करण्यात आले. राज्यसभेत जेव्हा या विधेयकावरचा अहवाल सादर करण्यात आला तेव्हा विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. संसदीय समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल सादर होताच विरोधकांनी गदारोळ करण्यास आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

लोकसभेत जेव्हा कामकाज तहकूब करण्यात आलं त्यानंतर प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी जोरदार आंदोलन केले. वक्फ सुधारणा विधेयक आणून भाजपाला तिरस्कार पसरवायचा आहे असा आरोप विरोधी पक्षातील खासदारांनी केला आहे.राज्यसभेत जेव्हा वक्फ सुधारणा विधेयकावर संसदीय समितीचा अहवाल सादर झाला तेव्हाही गदारोळ झाला. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हा आरोप केला आहे की या सुधारणा विधेयकात अनेक कमतरता आणि त्रुटी आहेत. सरकारने त्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे.

लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ
राज्यसभेत वक्फवरुन प्रचंड गदारोळ झाल्यानंतही या संदर्भातला अहवाल भाजपा खासदार मेधा कुलकण यांनी मांडला. या दरम्यान विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला. सभापती जगदीप धनकड यांनी गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज 15 मिनिटांसाठी स्थगित केलं होतं. राज्यसभेत जसा राडा झाला तसाच तो लोकसभेतही झाला. ज्यानंतर हे विधेयक मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली. लोकसभेत विरोधकांचा गदारोळ इतका वाढला की लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी 2 पर्यंत स्थगित केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...