spot_img
ब्रेकिंगपुढील चार दिवस महत्वाचे! 'या' जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार

पुढील चार दिवस महत्वाचे! ‘या’ जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री:-
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज हवामान विभागाने मुंबईसह कोकणात, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे, तसेच अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. मात्र, पुण्यामध्ये पावसाची हलकी बरसात सुरूच आहे. सांगली, कोल्हापूरमध्येही पावसाचा जोर कमी झाला आहे.

मात्र, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील चार दिवस म्हणजेच १ ते ४ ऑगस्ट या काळात राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुण्यासह विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तर दुसरीकडे मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...