spot_img
अहमदनगरसंक्रातीच्या मध्यरात्री घटना; दोन तरुणांचा मृत्य, चौघांवर उपचार सुरू...नेमकं काय घडलं?

संक्रातीच्या मध्यरात्री घटना; दोन तरुणांचा मृत्य, चौघांवर उपचार सुरू…नेमकं काय घडलं?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी फाटा येथे चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहाता तालुक्यातील तिसगाव येथील रहिवासी असलेले सहा जण मारुती सुझुकी कंपनीच्या इको गाडीतून राहत्या कडून वणी-दिंडोरीकडे जात असताना कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी फाटा येथे वळणावर चालकाचे कारवरील नियंत्र सुटले. त्यामुळे भिषण अपघात घडला.

अपघातात संदीप बाळासाहेब सदाफळ ( रा.तिसगाव वाडी ता. राहाता ) ऋषिकेश मधुकर कडू (रा. तिसगाव वाडी ता. राहाता ) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या घटनेबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. ढिकले यांनी दिलेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....