spot_img
ब्रेकिंग"बारामतीतील सरडा रंग बदलणारा, अचानक गुलाबी पण..." ; संजय राऊतांनी सोडलं अजित...

“बारामतीतील सरडा रंग बदलणारा, अचानक गुलाबी पण…” ; संजय राऊतांनी सोडलं अजित पवारांवर टीकास्त्र

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या भाग म्हणून महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या मेळाव्यात अनेक ताज्या राजकीय चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप झाले. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि इतर प्रमुख नेत्यांनी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला, तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सरडा म्हणून संबोधित करत टीकास्त्र सोडले.

राऊतांनी आपल्या भाषणात अजित पवारांचे तीव्र विरोधक म्हणून चित्रण केले. त्यांनी म्हटले की, “सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. तिच्या साठी महाराष्ट्र लढला आहे. परंतु तुमचे लाडके भाऊ रंग बदलले आहेत. ते आता पिंक झाले आहेत. सरडा रंग बदलतो, पण अचानक गुलाबी कसा होईल? आता हा गुलाबी सरडा बारामती सोडणार असं ऐकलं आहे.”

राऊतांनी पुढे सांगितले की, तेलंगणा राज्यात केसीआर यांच्या नेतृत्वाखाली गुलाबी रंगातील राजकारण पराभूत झाले आहे आणि पिंक रंग कधीही राजकारणात यशस्वी होत नाही. त्यांनी दावा केला की, भगवा रंग किंवा तिरंगा हेच यशाच्या प्रतीक आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार तिरंग्याचे रक्षण फक्त भगवा रंग करू शकतो. असे म्हणत राऊतांनी अजित पवारांविषयी सुस्पष्ट उल्लेख न करता त्यांच्यावर घणाघात केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘मुलाचे बरेवाईट झाल्यास सोडणार नाही’; विद्यार्थिनीला धमकावणे पडले महागात, वाचा प्रकरण

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- एका १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर प्रेमसंबंधासाठी बळजबरी, सतत पाठलाग आणि...

आ. सत्यजीत तांबे यांची पत्रकार परिषद; संगमनेरकरांसाठी महत्वाची अपडेट..

संगमनेर । नगर सहयाद्री:- संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या थेट सहभागातून जाहीरनामा...

नगर ब्रेकिंग! कामरगाव शिवारात बिबट्या ठार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर–पुणे महामार्गावरिल कामरगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीचा बिबट्या...

रेडबुल वाटून विकास होत नाही, तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विक्री करण्याची वेळ कोणी आणली?; पारनेर मध्ये मंत्री विखे पाटील कुणावर बरसले?

पारनेर । नगर सहयाद्री जाणत्या राजांनी जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना केल्या, मात्र प्रत्यक्षात निधी...