spot_img
महाराष्ट्रसत्तेचा आनंद मिळूच देणार नाही! जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला इशारा

सत्तेचा आनंद मिळूच देणार नाही! जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला इशारा

spot_img

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास महायुती सरकार सत्तेत येऊनही त्यांना आनंद मिळू देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला. जरांगे यांचा मुलगा जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याला भेटण्यासाठी जरांगे आले असता जालना माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

मराठा समाज जेवढा समजदार तेवढाच आक्रमक आहे. कोणीही आले तरी आरक्षणासाठी लढाई करावी लागणार आहे. आमच्या लेकरांना आम्हाला अधिकारी करायचे आहे. या पुढील उपोषण सरकार स्थापन झाल्यावर जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे आहे. नवीन सरकार कोणाचेही येऊ त्यांना शुभेच्छा आहेतच. अवकाळी पावसाने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

महायुती सरकारने लाडक्या बहिणींना पैसे दिले. आता शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे न मिळाल्यास रूमणे हातात घेऊन नुकसान भरपाई मागणार आहे. मराठ्यांशिवाय राज्यात कोणाचीही सत्ता येणार नाही. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास गावागावांतील मराठे या सरकारमधील लोकांना जाब विचारणार आहेत, असे जरांगे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...