spot_img
अहमदनगरसाकळाई पाणी योजनेचा प्रश्न पुन्हा पेटणार! कारण काय? वाचा सविस्तर..

साकळाई पाणी योजनेचा प्रश्न पुन्हा पेटणार! कारण काय? वाचा सविस्तर..

spot_img

कृती समितीकडून गुरुवारी बैठकीचे आयोजन | देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याची मागणी
अहमदनगर | नगर सह्याद्री:-
बहुचर्चित साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजनेसाठी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळकी येथे दिलेला शब्द पूर्ण करावा. तसेच अनेक दिवसांपासून रखडलेली पाणी योजना मार्गी लागावी यासाठी साकळाई कृती समितीच्यावतीने सरकारला आठवण करुन देण्यासाठी व योजनेबाबत पुढील रुपरेषा ठरविण्यासाठी गुरुवार दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी हिवरे झरे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला लाभधारक शेतकर्‍यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

गेल्या ४०-५० वर्षांपासून साकळाई पाणी योजनेचा प्रश्न भीजत पडला आहे. लाभधारक क्षेत्रातील ३५ गावांमधील नागरिकांनी योजनेसाठी वारंवार आंदोलन, उपोषण, मोर्चे, रास्तारोको, निवेदने देऊन सरकारला आठवण करुन देण्याचे काम केले आहे. परंतु, अद्यापही साकळाई योजनेला मूर्त स्वरुप आलेले नाही. दरम्यानच्या काळात गत लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ वाळकी येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.

त्यावेळी फडणवीस यांनी साकळाई योजनेचा शब्द दिला होता. त्यानंतरच्या काळात राज्यात सत्ताबदल झाल्याने साकळाई योजनेचा विषय मागे पडला. परंतु, नंतर राज्यात पुन्हा भाजपा-शिवसेनेचे सरकार आल्याने माजी खासदार सुजय विखे पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार दरबारी हालचाली करत साकळाई योजनेसाठी लागणारे पाणी कागदोपत्री उपलब्ध असल्याचे दाखविले.

त्यासाठी आमदार बबनराव पाचपुते, भाजपाचे नेते शिवाजी कर्डिले यांनीही पाठपुरावा केला. तसेच साकळाईच्या सर्व्हेचे आदेश काढले. साकळाईच्या सर्व्हेक्षणासाठी निधी टाकून सर्व्हेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे. आता योजनेसाठी पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. याची गेल्या सहा महिन्यांपासून मागणी होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साकळाई योजनेसाठी कृती समितीसह, शेतकरी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून गुरुवारी योजनेसाठी पाणी उपलब्ध प्रमाणपत्र मिळण्यासाठी व पुढील नियोजन ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेबाबत दिलेला शब्द पूर्ण करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीला कृती समितीचे अध्यक्ष हभप बाबा महाराज झेंडे, नारायण रोडे, संतोष लगड, सोमनाथ धाडगे, सरपंच सुरेश काटे, धामणे सर, ज्ञानदेव भोसले, शिवाजीराव विधाटे, रामदास झेंडे, रोहिदास उदमले, अमोल लंके, सोन्याबापू वाणी, राजेंद्र झेंडे, पुरुषोत्तम लगड, प्रतापराव नलगे आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar Politics News: राष्ट्रवादीचे संपत बारस्कर आंदोलन छेडणार! कारण काय? वाचा सविस्तर

Ahmednagar Politics News; सावेडी उपनगर परिसरात बंधन लॉन ते राजवीर चौक ते भिस्तबाग महाल...

Ahmednagar Accident News: अहमदनगरमध्ये भीषण अपघात? तीन ठार; दोन गंभीर..

Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाता लुक्यातील पारगाव रस्त्यावर एक ते दीड तासाच्या अंतराने...

Pitru Paksha: पितृपक्षात श्राद्ध विधी करणे गरजेचा का आहे? महाभारताच्या १३ व्या अध्यायात नेमकं काय? जाणून घ्या

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात व्यक्तीने आपल्या पितरांच्या मोक्ष आणि समाधानासाठी श्राद्ध, तर्पण...

Ahmednagar Crime: खळबळजनक! पोलिसांना मध्यस्थी भोवली! आरोपींकडून मारहाण; कुठे घडला प्रकार?

Ahmednagar Crime: कोपरगाव तहसील कार्यालयात शेजारी असलेल्या लॉकपगार्ड येथे आरोपी आपापसात भांडत करत असतांना...