spot_img
अहमदनगरचक्रीवादळ आले आणि होत्याचे नव्हते झाले! शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान, हाता तोंडाशी...

चक्रीवादळ आले आणि होत्याचे नव्हते झाले! शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान, हाता तोंडाशी आलेले…

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शेंडेवाडी येथील शेतकरी संतोष भिमाजी आल्हाट यांच्या दीड एकर दोडका बागेतील अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे मंडप उडाल्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी संतोष आल्हाट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हा प्रकार लोणी व्यंकनाथ च्या शेंडेवाडी येथील संतोष आल्हाट यांच्या गट नंबर ५९७ या क्षेत्रात नुकसान झाल्याचे समजले.

एकीकडे शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती सुधारत असताना भाजीपाला व इतर पिके कमी कालावधीत घेऊन अधिक उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करत असतानाच निसर्ग मात्र शेतकऱ्यांना हाता तोंडाशी आलेले पीक हिरावून घेत आहे. असाच प्रकार मंगळवार दिनांक ३० जुलै रोजी सायंकाळी साधारणतः चार वाजता अचानक चक्रीवादळ फिरले आणि होत्याचे नव्हते झाले.
लोणी व्यंकनाथ येथील गरीब कुटुंबातील शेतकरी संतोष आल्हाट यांनी दोन महिन्यापूर्वी दोडक्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये दोडक्याची शेती करत असताना या पिकाला बाधा येऊ नये म्हणून चहूबाजूने सुरक्षिततेसाठी मंडप उभारला त्यासाठी या मंडपाला जवळपास दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले.

सदर दोडक्याची पीक बाधित होऊ नये म्हणून वेळोवेळी विविध प्रकारच्या फवारणी केल्या. आता हे पीक काही दिवसातच हाती लागणार होते. परंतु अचानकच्या चक्रीवादळाने जवळपास साडेपाच ते सहा लाख रुपयेचे संबंधित शेतकऱ्यांना मिळणार होते. परंतु अचानक चक्रीवादळाने दोडका पिकावरील मंडप उडून गेला या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.दरम्यान या नुकसानग्रस्त पिकाची प्रत्यक्ष दर्शनी पाहणी केल्यानंतर संबंधित शेतकरी संतोष आल्हाट व त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. या दोडक्याच्या उत्पन्नासाठी आल्हाट कुटुंबीयांनी तळहाताप्रमाणे या पिकाला जोपासले. त्यामध्ये सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे दोडका पिकाची संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्याने उत्तम प्रकारे जोपासना केली.

आता हे पीक काही दिवसातच हाती लागणार होते. परंतु चक्रीवादळाने दोडका पिकावरील छेत कोसळल्याने संपूर्ण दोडका पीक हस्तव्यस्तपणे पडले. त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासन नियमानुसार नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी संतोष आल्हाट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...