spot_img
ब्रेकिंगAhmednagar News:अस्मानी संकटाचा कहर! वीज कोसळून माय-लेकाचा मृत्यू, कुठे घडली घटना?

Ahmednagar News:अस्मानी संकटाचा कहर! वीज कोसळून माय-लेकाचा मृत्यू, कुठे घडली घटना?

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री-
श्रीगोंदा तालुक्यातील येवती इथं शेतात वीज कोसळल्याने न शेतकरी कुटुंबातील माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नवनाथ बाजीराव आढाव (२६) व मीनाबाई बाजीराव आढाव (५०, रा. दोघेही येवती, ता. श्रीगोंदा) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत.

शेतकरी कुटुंबातील माय लेकरांवर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (दि.२२) सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील येवती गावात घडली. पावसाचे वातावरण झाले म्हणून नवनाथ व मीनाबाई हे शेतामध्ये कांदे झाकण्यासाठी गेले होते. पाऊस आल्यामुळे ते झाडाच्या आडोशाला थांबले होते. यावेळी अचानक त्यांच्या अंगावर बीज पडून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

वीज एवढी भयंकर पडली की, त्या ठिकाणी लिंबाचे झाड भुईसपट झाले. मोठा आवाज आल्यामुळे शेजारील शेतकर्यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी त्या जागी जाऊन पाहिले असता मीनाबाई बाजीराव आढाव व त्यांचा मुलगा नवनाथ बाजीराव आढाव हे जागीच मृत्यू झालेले त्यांना दिसून आले. या घटनेने परिसरातून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...