spot_img
ब्रेकिंगAhmednagar News:अस्मानी संकटाचा कहर! वीज कोसळून माय-लेकाचा मृत्यू, कुठे घडली घटना?

Ahmednagar News:अस्मानी संकटाचा कहर! वीज कोसळून माय-लेकाचा मृत्यू, कुठे घडली घटना?

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री-
श्रीगोंदा तालुक्यातील येवती इथं शेतात वीज कोसळल्याने न शेतकरी कुटुंबातील माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नवनाथ बाजीराव आढाव (२६) व मीनाबाई बाजीराव आढाव (५०, रा. दोघेही येवती, ता. श्रीगोंदा) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत.

शेतकरी कुटुंबातील माय लेकरांवर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (दि.२२) सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील येवती गावात घडली. पावसाचे वातावरण झाले म्हणून नवनाथ व मीनाबाई हे शेतामध्ये कांदे झाकण्यासाठी गेले होते. पाऊस आल्यामुळे ते झाडाच्या आडोशाला थांबले होते. यावेळी अचानक त्यांच्या अंगावर बीज पडून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

वीज एवढी भयंकर पडली की, त्या ठिकाणी लिंबाचे झाड भुईसपट झाले. मोठा आवाज आल्यामुळे शेजारील शेतकर्यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी त्या जागी जाऊन पाहिले असता मीनाबाई बाजीराव आढाव व त्यांचा मुलगा नवनाथ बाजीराव आढाव हे जागीच मृत्यू झालेले त्यांना दिसून आले. या घटनेने परिसरातून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...