कुणाचं आयुष्य तर कुणाचं घरच वाहिलं | नगर तालुक्यातील खडकी, वाळकी येथील शेतकऱ्यांची हृदयद्रावक कहाणी
सुनील चोभे । नगर सहयाद्री:-
गेल्या वष समाधानकारक पाऊस झाला.. यंदाही मान्सून पूर्व पाऊस दमदार हजेरी लावत होता.. हवामान खात्यानेही यंदा चांगला पाऊस सांगितला होता.. पाऊस पडल्याने पिके चांगले येतील.. अजून गायी घेता येतील.. व्यावसायाची भरभराट होईल… काही पैसे हातात उरतील… डोक्यावरील कर्ज कमी होईल.. अशा भल्या मोठ्या आशा अपेक्षा होत्या… पण मंगळवारी वालुंबा नदीला आलेल्या अवकाळी पावसाच्या पुरामुळे सगळंच अपेक्षांसह वाहून गेलं. पुराने कुणाचं आयुष्य तर कुणाचं घरच वाहिलं. अक्षरशः या पुराने अनेकांच्या डोळ्यांत अवकाळी धारा आणल्या. ही कहाणी आहे अहिल्यानगर तालुक्यातील खडकी, वाळकी येथील शेतकऱ्यांची अन व्यावसायिकांची.
गेल्या दहा पंधरा दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. परंतु नगर तालुक्यात मंगळवारी दुपारी ढगफुटी सदृश पाऊस होऊन पूर्वा व वालुंबा नदीला पूर आला. त्यामुळे खडकी व वाळकी येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. तालुक्यातील सुमारे 45 गावांत प्रचंड नुकसान झाले. 124 घरांची पडझड झाली. फळबागा, भाजीपाला आणि उन्हाळी हंगामातील पिकांसह चारा पिकांचे तीन हजार हेक्टरवरील नुकसान झाले. 61 सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. वालुंबा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर आभाळ फाटल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटली. घरांची पडझड, शेतातील माती वाहून गेली, जनावरे वाहिली, चारा वाहून गेल्याच्या अनेक ठिकाणी घटना घडल्या. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने धान्य भिजले. नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.
अवकाळीचा 181 गावांतील सहा हजार शेतकऱ्यांना फटका
गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने अहिल्यानगर तालुक्यासह जिल्ह्यात कहर केला आहे. या पावसाने 181 गावांतील तीन हजार 513 हेक्टर क्षेत्रातील पिके आणि फळबागांना फटका बसला आहे. सहा हजार शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. यामध्ये नगर तालुक्यातील अडीच हजार हेक्टरचा समावेश आहे. या तालुक्यातील 45 गावांतील कांदा, बाजरी, मिरची, डाळिंब, संत्रा, भूईमुग, टोमॅटो, आंबा, केळी आदी पिके आणि फळांचे नुकसान झाले आहे. याचा आर्थिक फटका चार हजार 176 शेतकऱ्यांना बसला आहे. पारनेर तालुक्यातील 34, पाथडतील 1, कर्जत 36, श्रीगोंदा 33, जामखेड 10, राहुरी 15, नेवासे 5, अकोला 1, कोपरगाव तालुक्यातील 1 गावातील उन्हाळी पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे.

brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2097152;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 41;
नोकरी नाही म्हणून व्यावसाय केला पण पावसाचं आभाळ डोक्यावर कोसळलं..
अहिल्यानगर तालुक्यातील खडकी येथील विकास कोठुळे हा उच्चशिक्षित. बीकॉम शिक्षण पूर्ण केलेेले. नोकरीसाठी अनेक वेळा प्रयत्न केले. परंतु, नोकरी मिळाली नाही. त्यामुळे व्यावसाय करण्याचा निश्चय केला. नगरमध्ये तीन वर्ष दुकानात काम केले. त्यानंतर स्वतःच दुकान टाकायचे ठरवले. सहा-सात वर्षापूव सोसायटीचे कर्ज काढून शिवशक्ती ॲल्युमिनिअम ॲण्ड स्टील वर्क्सचा व्यवसाय सुरु केला. मध्येच कोरोनाची लाट आली. त्यात व्यवसाय कसाबसा टिकवून ठेवला. यंदा व्यवसायात चांगला जम बसत चालला होता. चांगला पाऊस पडेल आणि व्यावसायात वाढ होईल असे वाटत होते. चांगल्या पावसालाही सुरुवात झाली होती. परंतु मंगळवारी वालुंबा नदीला आलेल्या पुराने दुकानात पाणी शिरले आणि सगळीच दैना झाली… दुकानातील प्लायवूड, ग्लास, सनमाईका, कटर मशीन, कॉम्प्युटर यांसह सर्वच साहित्य पाण्यात भिजले. गाळ्यात 10 फुटांपर्यंत पाणी आले होते. दुकानाबाहेर ठेवलेले काही साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले… पुराच्या पाण्यात काय वाहून गेले हे सांगायला शब्दच नाहीत… अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यावसायिक विकास कोठुळे यांनी ‘नगर सह्याद्री’शी बोलताना दिली.

brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 44;
आठ गायी, चारा 100 ते 125 टन, पशुखाद्य, शेणखत, घरातील संसारोपयोगी साहित्यच वाहून गेलं
नोकरी मिळत नसल्याने अहिल्यानगर तालुक्यातील खडकी येथील नंदू गंगाधर रोकडे हा युवक गेल्या 10 वर्षांपासून दूध व्यवसाय करत आहे. सध्या त्यांच्या 25 जनावरे होती. दूध व्यवसायात चांगला जम बसवत 15 गुंठ्यात चांगला प्रशस्त गोठा उभारला होता. काही दिवसांपूव बँकेचे 12 लाख रुपये कर्ज काढून आणखी गायी घेतल्या व व्यवसायात वाढ केली होती. उन्हाळ्यात जनावरांना चांगला पौष्टिक आहार मिळावा म्हणून 100 ते 125 टन मूरघास बॅग भरून ठेवल्या होत्या. परंतु मंगळवारी आलेल्या पुरात मूरघासच्या सर्वच बॅगा वाहून गेल्या. पशुखाद्याच्या 10 बॅगा वाहून गेल्या. एक ते दीड लाखाचे शेणखत वाहून गेले. गायींच्या मॅट वाहून गेल्या.. आठ गायी वाहून गेल्या.. तसेच घरात पाणी शिरल्याने धान्य भिजले.. संसारोपयोगी साहित्य वाहून गेले… गोठ्याची पडझड झाली… डोक्यावर आभाळ कोसळल्याची उद्विग्न प्रतिक्रिया नंदू रोकडे यांनी ‘नगर सह्याद्री’शी बोलतांना दिली.

brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 38;