spot_img
ब्रेकिंगधुळे हादरले! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

धुळे हादरले! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

spot_img

धुळे | नगर सह्याद्री

धुळे शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरात एकाच कुटुंबांतील चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आई वडील, आणि दोन मुलांनी आत्महत्या केल्या असून या भयंकर घटनेने जिल्हा हादरुन गेला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरु आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकाच घरातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळ्यामध्ये घडली आहे. आई वडील आणि दोन मुलांचा मृतांमध्ये समावेश असून धुळे शहरातील समर्थ कॉलनीमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला आहे. प्रवीण मानसिंग गिरासे, गीता प्रवीण गिरासे व मुलं मितेश प्रवीण गिरासे, सोहम प्रवीण गिरासे असे आत्महत्या करणार्‍या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. यापैकी प्रविण गिरासे यांनी गळफास घेऊन तर कुटुंबातील इतर तिघे जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. आई वडिलांनी दोन सोन्यासारख्या लेकरांसोबत आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या सामुहिक आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नसून संपूर्ण कुटुंबाने इतया टोकाचा निर्णय का घेतला असावा? असा सवाल आता उपस्थित होत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...