spot_img
ब्रेकिंगधरणाची अवस्था अत्यंत वाईट, सरकारचे दुष्काळाकडे दुर्लक्ष: शरद पवार

धरणाची अवस्था अत्यंत वाईट, सरकारचे दुष्काळाकडे दुर्लक्ष: शरद पवार

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुष्काळी स्थितीवर भाष्य करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याच्या टंचाईमुळे चिंताजनक स्थिती आहे. धरणाची अवस्था अत्यंत वाईट आहे. संभाजीनगरमध्ये १० टक्के पाणी आहे. पुणे विभागात ३५ धरणं आहेत तिथे १६ टक्के पाणीसाठा आहे. नाशिकमध्ये २२ धरणे आहेत तिथे २२ टक्के पाणी आहे. कोकणात २९ टक्के पाणी आहे, अशी माहिती पवारांनी दिली आहे.

उजनी धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठी शून्य आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ५ टक्के पाठीसाठा आहे, माजलगावमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. मांजरा धरणात अर्धा टक्का सुद्धा पाणी नाही. धाराशिव जिल्हात शून्य टक्के पाणीसाठा आहे. अहमदनगरमध्ये ९ टक्के पाणीसाठा आहे, असे पवार म्हणाले.
राज्यात यंदा १०, ५७२ टँकर लागत आहेत, मागील वर्षी १,१०८ टँकर लागत होते.

यावरुन स्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. राज्यात अनेक ठिकाणी चारा छावण्यांची मागणी करण्यात येत आहे. संभाजीनगर आणि पुण्यामध्ये दुष्काळी काम काढणं, किंवा रोजगार हमीचे कामं काढणं आवश्यक आहे, असं शरद पवार यांनी सूचवले आहे. राज्याची स्थिती गंभीर असून सरकारचे त्याकडे लक्ष नसल्याची टीका पवारांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी!; ‘त्या’ यादीत आपले नाव आहे का? ते पाहा…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री;- नगर अर्बन बँकेत पाच लाखाहून अधिक रकमेच्या ठेवी अडकलेल्या ठेवीदारांना निम्मी...

आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी; ‘दो दिन के अंदर…’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप यांना बुधवारी रात्री...

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी ‘गुरुवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...