spot_img
ब्रेकिंगधरणाची अवस्था अत्यंत वाईट, सरकारचे दुष्काळाकडे दुर्लक्ष: शरद पवार

धरणाची अवस्था अत्यंत वाईट, सरकारचे दुष्काळाकडे दुर्लक्ष: शरद पवार

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुष्काळी स्थितीवर भाष्य करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याच्या टंचाईमुळे चिंताजनक स्थिती आहे. धरणाची अवस्था अत्यंत वाईट आहे. संभाजीनगरमध्ये १० टक्के पाणी आहे. पुणे विभागात ३५ धरणं आहेत तिथे १६ टक्के पाणीसाठा आहे. नाशिकमध्ये २२ धरणे आहेत तिथे २२ टक्के पाणी आहे. कोकणात २९ टक्के पाणी आहे, अशी माहिती पवारांनी दिली आहे.

उजनी धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठी शून्य आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ५ टक्के पाठीसाठा आहे, माजलगावमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. मांजरा धरणात अर्धा टक्का सुद्धा पाणी नाही. धाराशिव जिल्हात शून्य टक्के पाणीसाठा आहे. अहमदनगरमध्ये ९ टक्के पाणीसाठा आहे, असे पवार म्हणाले.
राज्यात यंदा १०, ५७२ टँकर लागत आहेत, मागील वर्षी १,१०८ टँकर लागत होते.

यावरुन स्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. राज्यात अनेक ठिकाणी चारा छावण्यांची मागणी करण्यात येत आहे. संभाजीनगर आणि पुण्यामध्ये दुष्काळी काम काढणं, किंवा रोजगार हमीचे कामं काढणं आवश्यक आहे, असं शरद पवार यांनी सूचवले आहे. राज्याची स्थिती गंभीर असून सरकारचे त्याकडे लक्ष नसल्याची टीका पवारांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कुकडीचे आवर्तन तातडीने सोडा; कोणी केली मागणी पहा…

माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के यांचे उपोषण सुरू श्रीगोंदा | नगर सह्याद्री कुकडीच्या सल्लागार समितीची...

कर्जत नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, आता काय घडलं पहा

उच्च न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस , गटनेता बदलण्याचा प्रस्ताव पुन्हा कोर्टात कर्जत | नगर सह्याद्री कर्जत...

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर संक्रात; इतक्या ठिकाणी रेड, पहा सविस्तर

विविध ३३ गुन्ह्यांत पाच लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्हा पोलीस अधीक्षक...

संगमनेरचे राजकीय वातावरण बिघडले; थोरातांचा मंत्री विखेंवर निशाणा, काय म्हणाले पहा

संगमनेर | नगर सह्याद्री तालुक्यात सध्या राजकीय वातावरणात घडत असलेल्या बदलांमुळे एक प्रकारची दहशतीची भावना...