spot_img
ब्रेकिंग‘किडलेल्या व्यवस्थेला बायपास सर्जरीची गरज’ रोहित पवारांचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल

‘किडलेल्या व्यवस्थेला बायपास सर्जरीची गरज’ रोहित पवारांचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल

spot_img

पुणे। नगर सहयाद्री-
पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट समोर येत आहे. त्यातच आता पोर्शे कार अपघातावरून रोहित पवार पुन्हा आक्रमक झाले आहे. या अपघातावरून त्यांनी ट्विटर अकाउंटवर पोस्ट करत सरकारवर जहरी टीका केली आहे. किडलेल्या व्यवस्थेला बायपास सर्जरीची गरज असल्याची पोस्ट करत त्यांनी सरकारच्या व्यवस्थेवर हल्लाबोल केला आहे.

कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल, वडील विशाल अग्रवाल यांच्यानंतर आई शिवाणी अग्रवाल यांना देखील अटक करण्यात आली आहे. पुणे हिट अँड रनप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे किडलेल्या व्यवस्थेच पितळ उघड पडलं आहे. पोलीस विभागातील अधिकाऱ्यांचे, डॉक्टरांचे कारनामे देखील उघडकीस आले असून आरटीओ आणि एक्साईज विभागावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे.

आमदार रोहित पवार यांच्या ट्विटमध्ये नेमकं काय?
कल्याणीनगरमध्ये दोन निष्पापांना गाडीखाली चिरडल्यानंतर किडलेल्या संपूर्ण यंत्रणेचंच पितळ उघड पडलं आहे. पोलिस विभागातील अधिकाऱ्यांचे कारनामे उघडकीस आले, डॉक्टरांनी हात धुवून घेतले, RTO ने डोळे मिटून दूध पिलं तर एक्साईज विभाग नशेत असल्याचं दिसून आलं आहे.

बाल न्याय मंडळानेही ‘निबंध’ लिहायला सांगून दोघांचा बळी घेणाऱ्या आरोपीला एका दिवसात मोकळं सोडलं. एरवी रस्त्यावरच्या भाजीवाल्याकडूनही दंड वसूल करणाऱ्या महापालिकेलाही मग जाग आली आणि त्यांनी घाऊक स्वरुपात हॉटेलांवर कारवाई करुन हातावर पोट असलेल्या अनेक सामान्य कामगारांच्या नोकऱ्यांचा घोट घेतला.

हे संपूर्ण व्यवस्था सडल्याचंच लक्षण आहे. म्हणून सामान्य लोकांनाच दबाव आणून या किडलेल्या व्यवस्थेवरच बायपास सर्जरी करावी लागणार आहे. नाहीतरी आज त्या दोन मृतांना न्याय मिळण्याची जी काही शक्यता निर्माण झालीय तीही केवळ सामान्य लोकांच्या दबावामुळेच, हे विसरता येणार नाही. असं म्हंटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...