spot_img
ब्रेकिंगवऱ्हाड लग्नाला निघालेलं, भरधाव बस अचानक उलटली; भीषण अपघातात 'इतके' ठार

वऱ्हाड लग्नाला निघालेलं, भरधाव बस अचानक उलटली; भीषण अपघातात ‘इतके’ ठार

spot_img

Accident News: पुण्याहून रायगडच्या दिशेने येणाऱ्या खाजगी बसला ताम्हणी घाटात अपघात झाला. चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्याने बस उलटली यात पाच जण दगावल्याची प्राथमिक माहिती आहे.

लग्नाचे वऱ्हाड घेऊन बस महाडच्या दिशेने येत होती त्यामुळे घाटात एका तीव्र वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस कडेला जाऊन उलटली. या अपघातात पाच जण बस खाली चिरडले गेले त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. २५ जण जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष यांचा समवेश आहे. संगीता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार, वंदना जाधव अशी मृतांची नावे आहे. एका मृतांची ओळख पटलेली नाही अशी माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मदत व बचाव कार्याला सुरुवात केली आहे. बसमधील जखमी व्यक्तींना माणगाव येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाच्या हाती येणार? सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना पक्षाच्या नावावरून...

साहेब! सांगा कचरा टाकू कुठे? ‘या’ भागातील महिलांचा सवाल, वाचा आयुक्त डांगे यांचे उत्तर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून शहरातील...

खळबळजनक आरोप: ‘आरएसएसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडला संपवण्याची योजना’

प्रवीण गायकवाड यांचा दीपक काटेला तुरुंगात सुविधा पुरवणार असल्याचा आरोप मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या...

नगरमधून अपहरण, आळंदीत अत्याचार; वारकरी शिक्षण संस्थेत चाललंय काय? महिला कीर्तनकारासह..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पुण्याच्या आळंदी येथे धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर येथून...