spot_img
ब्रेकिंगसर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या याचिकेवर 'या' तारखेला सुप्रीम निर्णय होणार...

सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या याचिकेवर ‘या’ तारखेला सुप्रीम निर्णय होणार…

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ११ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या याचिकेवर अंतिम निर्णय याच दिवशी येण्याची शक्यता असल्यामुळे मराठा समाज आणि राज्य सरकार यांचे याकडे लक्ष लागून आहे.

मराठा आरक्षणासंबंधी न्यायालयीन लढाईमध्ये राज्य सरकारला याआधी अपयश आले होते, तरीही राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करत सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला. ही याचिका आता सुप्रीम कोर्टात अंतिम टप्प्यावर असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर आता पुन्हा सुनावणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या याचिकेवर येत्या ११ सप्टेंबरला अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे.मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

विनोद पाटील यांनीच सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर आता ११ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय येणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.राज्याचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.

मराठा समाज अनेक वर्षांपासून न्यायाची वाट पाहत आहे. तर समाजाला कुणबी मराठा म्हणून मान्यता मिळेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे 11 तारखेला होणारी सुनावणी न्याय मिळण्याची अंतिम संधी मानली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर आता याबाबतची जबाबदारी आहे, त्याचं कारण म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी काय काय केलं, तसेच मराठा समाजाला न्याय देण्यासाठी देखील ते प्रयत्न करतील अशी अपेक्षा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...

नगरमध्ये चाललंय काय? दोन दिवसात ‘इतक्या’ अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या...

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पहा कुठे काय परस्थिती?

नाशिक । नगर सहयाद्री :- नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून...