spot_img
ब्रेकिंगसर्वात मोठी कारवाई ! 33 खासदारांना केले निलंबित

सर्वात मोठी कारवाई ! 33 खासदारांना केले निलंबित

spot_img

नवी दिल्ली / नगरसह्याद्री : लोकसभा अध्यक्षांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. लोकसभेतील एकूण 33 खासदारांना निलंबित केलं आहे. लोकसभेत कामकाज सुरू असताना गोंधळ घातल्याने ही कारवाई करण्यात आली.

यातील अनेक खासदारांना संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केलं आहे. विरोधी पक्ष संसदेच्या सुरक्षेबाबतच्या आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर या सर्व 31 खासदारांना निलंबित केले गेले.

या आधी दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या 13 खासदारांना निलंबित केले आहे. लोकसभा अध्यक्षांचं विरोधी पक्षाचे खासदार ऐकतच नव्हते. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांना कठोर पाऊल उचलावं लागलं आहे. लोकसभेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले होते.

विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. काही खासदार तर वेलमध्ये येऊन गोंधळ घालत होते. या सर्व खासदारांना संसदेच्या विशेष अवधीसाठी निलंबित करण्यात आलं आहे. कल्याण बॅनर्जी, ए राजा, दयानिधी मारन, अपरुप पोदार, प्रसून बॅनर्जी, ईटी मोहम्मद बशीर, जी सेल्वल्म, अन्नादुरई, टी सुमति, अधीर रंजन चौधरी,

रवीस्वामी प्रेम चंद्रन, शताब्दी रॉय, सौगत रॉय, असीथ कुमार, कौशल कुमार, एंटो एंटोनी, पल्ली मणिकम, प्रतिभा मंडल, काकोली घोष, सुनील मंडल, के मुरलधरन आणि अमर सिंह आदी खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. आता पर्यंत निलंबित खासदारांची संख्या 47 झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट ; नगरसेवक योगीराज गाडे काय म्हणाले पहा

अहिल्यानगर । नगर सह्याद्री महापालिका व आयुक्त यशवंत डांगे जनतेची दिशाभूल करत असून नव्या कचरा...

आयुक्त डांगेंच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, नेमकं प्रकरण काय पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर...

धक्कादायक ! डॉक्टर महिलेच्या मृत्यूचा PM रिपोर्ट आला पण…’या’ प्रश्नांचं गूढ अद्याप कायम

सातारा / नगर सह्याद्री - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या युवा...

बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम; पारनेरचे भूमिपुत्र आंदोलनात दाखल

पारनेर / नगर सह्याद्री - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी...