spot_img
ब्रेकिंगसर्वात मोठी कारवाई ! 33 खासदारांना केले निलंबित

सर्वात मोठी कारवाई ! 33 खासदारांना केले निलंबित

spot_img

नवी दिल्ली / नगरसह्याद्री : लोकसभा अध्यक्षांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. लोकसभेतील एकूण 33 खासदारांना निलंबित केलं आहे. लोकसभेत कामकाज सुरू असताना गोंधळ घातल्याने ही कारवाई करण्यात आली.

यातील अनेक खासदारांना संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केलं आहे. विरोधी पक्ष संसदेच्या सुरक्षेबाबतच्या आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर या सर्व 31 खासदारांना निलंबित केले गेले.

या आधी दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या 13 खासदारांना निलंबित केले आहे. लोकसभा अध्यक्षांचं विरोधी पक्षाचे खासदार ऐकतच नव्हते. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांना कठोर पाऊल उचलावं लागलं आहे. लोकसभेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले होते.

विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. काही खासदार तर वेलमध्ये येऊन गोंधळ घालत होते. या सर्व खासदारांना संसदेच्या विशेष अवधीसाठी निलंबित करण्यात आलं आहे. कल्याण बॅनर्जी, ए राजा, दयानिधी मारन, अपरुप पोदार, प्रसून बॅनर्जी, ईटी मोहम्मद बशीर, जी सेल्वल्म, अन्नादुरई, टी सुमति, अधीर रंजन चौधरी,

रवीस्वामी प्रेम चंद्रन, शताब्दी रॉय, सौगत रॉय, असीथ कुमार, कौशल कुमार, एंटो एंटोनी, पल्ली मणिकम, प्रतिभा मंडल, काकोली घोष, सुनील मंडल, के मुरलधरन आणि अमर सिंह आदी खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. आता पर्यंत निलंबित खासदारांची संख्या 47 झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...