spot_img
राजकारणभारतीय लोकशाहीची घंटा वाजायला सुरवात झाली.. जयंत पाटलांचे अहमदनगरमधून शरसंधान

भारतीय लोकशाहीची घंटा वाजायला सुरवात झाली.. जयंत पाटलांचे अहमदनगरमधून शरसंधान

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : शरद पवार गटाचे जयंत पाटील हे आज अहमदनगर मध्ये आहेत. त्यांनी कर्जतमध्ये विजय निश्चिती मेळावा व अहमदनगरमध्ये बैठक घेतली.

त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात मराठी माणसांनी निर्माण केलेले दोन पक्ष फोडले गेले, आमदारांना बाजूला करायचे काम झालं. स्वतः च्या ताकदीवर पक्ष काढायचा याची चर्चा झाली नाही. मात्र सरकार यंत्रणानी पक्ष फोडण्यास मदत केली.

भारतीय लोकशाहीची घंटा वाजायला सुरवात झाली आहे असा घणाघात जयंत पाटील यांनी केला. दरम्यान त्यांनी आ. रोहित पवार यांचेही कौतुक केले. रोहित पवारांनी विशेष लक्ष घालून काम केलं असं म्हटलं आहे. तसेच आपल्याला पवार साहेबांना साजेसं नाव पक्षाला मिळेल असेही ते म्हणाले.

दरम्यान आरक्षणाबाबत मुद्य्यांना त्यांनी हात घातला. ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. ओबीसी आरक्षणावर कोणी बोलत नाही. धनगर आरक्षणच काय झालं? सामाजिक अस्थिरता निर्माण झालीये. या सर्व गोष्टीला सरकारचा पाठिंबा आहे. असं चित्र आम्ही 40 वर्षांत पहिलेलं नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...