spot_img
राजकारणभारतीय लोकशाहीची घंटा वाजायला सुरवात झाली.. जयंत पाटलांचे अहमदनगरमधून शरसंधान

भारतीय लोकशाहीची घंटा वाजायला सुरवात झाली.. जयंत पाटलांचे अहमदनगरमधून शरसंधान

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : शरद पवार गटाचे जयंत पाटील हे आज अहमदनगर मध्ये आहेत. त्यांनी कर्जतमध्ये विजय निश्चिती मेळावा व अहमदनगरमध्ये बैठक घेतली.

त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात मराठी माणसांनी निर्माण केलेले दोन पक्ष फोडले गेले, आमदारांना बाजूला करायचे काम झालं. स्वतः च्या ताकदीवर पक्ष काढायचा याची चर्चा झाली नाही. मात्र सरकार यंत्रणानी पक्ष फोडण्यास मदत केली.

भारतीय लोकशाहीची घंटा वाजायला सुरवात झाली आहे असा घणाघात जयंत पाटील यांनी केला. दरम्यान त्यांनी आ. रोहित पवार यांचेही कौतुक केले. रोहित पवारांनी विशेष लक्ष घालून काम केलं असं म्हटलं आहे. तसेच आपल्याला पवार साहेबांना साजेसं नाव पक्षाला मिळेल असेही ते म्हणाले.

दरम्यान आरक्षणाबाबत मुद्य्यांना त्यांनी हात घातला. ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. ओबीसी आरक्षणावर कोणी बोलत नाही. धनगर आरक्षणच काय झालं? सामाजिक अस्थिरता निर्माण झालीये. या सर्व गोष्टीला सरकारचा पाठिंबा आहे. असं चित्र आम्ही 40 वर्षांत पहिलेलं नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...