spot_img
ब्रेकिंगठाकरे महायुतीवर कडाडले; राज्यात देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ मिळून...

ठाकरे महायुतीवर कडाडले; राज्यात देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ मिळून…

spot_img

अमरावती / नगर सह्याद्री –
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने घोषणांचा पाऊस केला आहे. महायुतीने मतदारांसाठी विविध घोषणा जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीने अनेक भागात प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, याच महायुतीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. ‘तीन भाऊ, सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी महायुतीवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे हे अमरावती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान,विधानसभेच्या जाहीर सभेत ठाकरे म्हणाले, ‘खासदार बळवंत वानखेडे यांना आम्ही दिल्लीत पाठवलं आहे. ही दर्यापूरची जागा शिवसेनेला दिली. आपण लोकसभेला दाखवून दिलं, पण हे आव्हान संपलं नाही. माजलेल्या सत्ताधाऱ्यांच्या बुडाखली ठिणगी पेटली आहे. यांच्या डोक्यात सत्ता गेली. हे फुग्यात गेले आहे. येथील खासदार कोणत्या मस्तीत होते, त्यांना तुम्ही हरवलं’.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर बोलताना ठाकरे म्हणाले, ‘मी कर्ज मुक्ती केल्यानंतर कधीच शो केला नाही. मी तुमच्यावर उपकार नाही केले. मी माझं कर्तव्य पार पडलं होतं. मी कमीत कमी काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं’.

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार ठाकरेंनी अमरावतीत घेतला. ‘मुंब्रा आमचाच आहे, तो काय पाकिस्तानात आहे का? फडणवीस यांना मला सांगायचं आहे की, मुंब्रा हे ठाणे जिल्ह्यामध्ये येते. आता त्यांचा पालकमंत्री गद्दार आहे पण गद्दऱ्यांच्या हाताने ते मंदिर होणार नाही ते बांधू शकत नाही. जो राजकोटचा पुतळा बांधला होता, तो वाऱ्यामुळे पडला. मग मुख्यमंत्र्यांची दाढी हालत नाही. दुसऱ्या मुख्यमंत्र्यांचं जॅकेट हालत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी माफी का मागितली नाही, असा सवाल करत ठाकरेंनी महायुतीवर टीका केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता प्रत्येक तालुक्याला भाजपचे तीन अध्यक्ष; निवडीकडे लागले सर्वांचे लक्ष

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी आता प्रत्येक...

‘कर्जुले हर्या येथे हरेश्वर महाराजांच्या उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता’

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथे स्वयंभू भगवान श्री हरेश्वर महाराज यांचा...

‘भिक्षेकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणाची मंत्री विखे पाटलांनी घेतली गंभीर दखल’; दिले मोठे आदेश

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्हा रुग्णालयात चार भिक्षेकरूंचा मृत्यूनंतर प्रशासनावर गंभीर आरोप झाले आहेत. पालकमंत्री...

‘नगरमध्ये भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिंसा परमो धर्म: अशा महान उपदेश देत संपूर्ण जगाला दिशा देणाऱ्या...