spot_img
महाराष्ट्रAccident News: भीषण अपघात चार ठार! कुठे घडली घटना?

Accident News: भीषण अपघात चार ठार! कुठे घडली घटना?

spot_img

Accident News:  बीड जिल्ह्यातील बर्दापूर फाट्यावर लातूर-बीड महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगळपुर येथील तीन जण आणि एक अन्य व्यक्ती, एकूण चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये बाबूराव खलंगरे, आत्माराम बानापुरे, सौदागर कांबळे यांचासह एकाचा समावेश आहे.ही घटना रात्री २ वाजता मुसळधार पावसात घडली. चार जण स्विफ्ट कार (क्र. एमएच 24 एएस 6334) ने औरंगाबादकडे जात होते. अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गा जवळ कार आणि समोरून येणाऱ्या कंटेनर (क्र. एमएच 12 एमव्ही 7188) यांची जोरदार धडक झाली.

अपघातानंतर कारचा चुराडा झाला आणि चौघे जागीच मृत झाले आहे. बर्दापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...