spot_img
ब्रेकिंगधारदार शस्त्रांनी वार! अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाना संपवलं...

धारदार शस्त्रांनी वार! अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाना संपवलं…

spot_img

Maharashtra Crime News: राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे विधानसभा निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच दुसरीकडे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये सचिन कुर्मी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भयंकर घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक मुंबईमच्या भायखळा परिसरामध्ये घडली आहे. या हल्ल्यामध्ये सचिन कुर्मी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे ही थरारक घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सचिन कुर्मी हे शुक्रवारी (ता. ४ ऑक्टोबर) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास म्हाडा कॉलनी परिसरात थांबले होते. यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात सचिन कुर्मी हे गंभीर जखमी झाले होते. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा कुर्मी हे जखमी अवस्थेत होते.

पोलिसांनी त्यांना तात्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सचिन कुर्मी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र समीर भुजबळ यांचे निकटवर्तीय होते. त्यांच्यावर कोणी हल्ला केला? या हल्ल्याचे कारण काय? याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...

‘जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त होणार’; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती..

पुणे । नगर सहयाद्री:- राज्यातील जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी समिती...