spot_img
अहमदनगररोहयोच्या कामांना स्थगिती द्या; आ. दाते यांची मागणी

रोहयोच्या कामांना स्थगिती द्या; आ. दाते यांची मागणी

spot_img

वाड्यावस्त्रयांवरील रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित राहण्याची शक्यता
पारनेर | नगर सह्याद्री
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मग्रारोहयो) अंतर्गत पारनेर तालुक्यात तहसिल कार्यालयाच्या मार्फत मंजुरी देण्यात आलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामांना स्थगिती देण्याची मागणी आमदार काशिनाथ दाते यांनी रोहयो खात्याचे मंत्री भरत गोगावले यांच्याकडे केली आहे. दरम्यान, आ. दाते यांच्या तक्रारीची दखल घेत याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आ. दाते यांच्या तक्रारीमुळे तालुक्यातील गाव आणि वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आ. दाते यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तहसिल कार्यालयाने मंजूर केलेल्या विविध कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसिल कार्यालयाशी संबंधितांवर कारवाई केल्याचा उल्लेख आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशीचे आदेश शासनाने दिले आहेत. आमदार दाते यांनी नमूद केले की, तहसीलदार पारनेर यांनी प्रशासकीय मान्यता आणि कार्यारंभ आदेशानुसार ही कामे लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मंजूर करण्यात आली. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप आहे.

त्यामुळे आयुक्त, मग्रारोहयो-महाराष्ट्र, जिल्हाधिकारी व जिल्हा कार्यक्रम समन्वयक (अहिल्यानगर), आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (अहिल्यानगर) यांना चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाने या प्रकरणी प्रचलित नियम व धोरणांनुसार योग्य कारवाई करण्यास सांगितले आहे. चौकशीअंती तयार झालेला स्वयंस्पष्ट आणि वस्तुनिष्ठ अहवाल ईमेलवर आणि उलट टपाली शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, आमदार काशिनाथ दाते यांनाही या कारवाईबाबत अवगत करण्याची सूचना आहे. या प्रकरणामुळे पारनेर तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक स्तरावर याबाबत तीव्र प्रतिक्रीया उमटण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...